Gujrat : आणंदमध्ये १०७ किलो ड्रग्ज जप्त

छापेमारीत ५ जणांना करण्यात आली अटक


आणंद : गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणंद जिल्ह्यातील खंभाट भागात मोठी कारवाई केली. यावेळी १०७ किलो अल्प्राझोलम पावडर जप्त करण्यात आले. तसेच ५ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आनंद जिल्ह्यात अल्प्राझोलम नावाच्या पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी एटीएसने १०७ कोटी रुपये किंमतीच्या प्रतिबंधीत ड्रग्जसह ५ जणांना अटक केली आहे. अल्प्राझोलमचा नशेसाठी गैरवापर केला जात असल्याने ते नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या कक्षेत येते. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सकडून (सीबीएन) अल्प्राझोलम उत्पादनासाठी परवाना दिला जातो.



दरम्यान, एटीएसच्या छाप्यादरम्यान संशयित आरोपींकडे परवाना मागितला असता, त्यांच्याकडे तो नव्हता. यावेळी पाच जण युनिट चालवत होते, तर सहावा व्यक्ती रिसीव्हर होता. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की पाचही आरोपींनी सायकोट्रॉपिक पदार्थ तयार करण्यासाठी कारखाना भाड्याने घेतला होता. दरम्यान गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, एटीएसने ५ जणांना अटक केली आहे. या कारवाईत झोपेच्या गोळ्या बनवण्यासाठी वापरली जाणारी १०७ किलोपेक्षा जास्त पावडर जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर