Gujrat : आणंदमध्ये १०७ किलो ड्रग्ज जप्त

  43

छापेमारीत ५ जणांना करण्यात आली अटक


आणंद : गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणंद जिल्ह्यातील खंभाट भागात मोठी कारवाई केली. यावेळी १०७ किलो अल्प्राझोलम पावडर जप्त करण्यात आले. तसेच ५ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आनंद जिल्ह्यात अल्प्राझोलम नावाच्या पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी एटीएसने १०७ कोटी रुपये किंमतीच्या प्रतिबंधीत ड्रग्जसह ५ जणांना अटक केली आहे. अल्प्राझोलमचा नशेसाठी गैरवापर केला जात असल्याने ते नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या कक्षेत येते. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्सकडून (सीबीएन) अल्प्राझोलम उत्पादनासाठी परवाना दिला जातो.



दरम्यान, एटीएसच्या छाप्यादरम्यान संशयित आरोपींकडे परवाना मागितला असता, त्यांच्याकडे तो नव्हता. यावेळी पाच जण युनिट चालवत होते, तर सहावा व्यक्ती रिसीव्हर होता. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की पाचही आरोपींनी सायकोट्रॉपिक पदार्थ तयार करण्यासाठी कारखाना भाड्याने घेतला होता. दरम्यान गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, एटीएसने ५ जणांना अटक केली आहे. या कारवाईत झोपेच्या गोळ्या बनवण्यासाठी वापरली जाणारी १०७ किलोपेक्षा जास्त पावडर जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.