Bollywood Daily Soaps : शूटिंग पूर्ण न करताच निघालेल्या अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमधून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. अभिनेता शूटिंग पूर्ण न करताच निघाल्याने निर्मात्याने अभिनेत्याला मालिकेच्या सेटवरच मारहाण केल्याची घटना घडली आहे. अभिनेत्यानं मालिकेच्या निर्मात्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.



'जय माँ लक्ष्मी' या लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर निर्मात्यांनी सुप्रसिद्ध अभिनेता शान मिश्राला मारहाण केली आहे. शान 'जय माँ लक्ष्मी' या मालिकेत श्री विष्णुंची भूमिका साकारत होता. शानच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने शानने निर्मात्यांना लवकर पॅकअप करण्याची विनंती केली. शानच्या हाताची दुखापत बघता डॉक्टरांनी त्याला सक्तीचा आराम करायला सांगितला होता मात्र शूटिंग मध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून शानने शूटिंगला जाण्यास तयारी दाखवली.







दरम्यान निर्माता व निर्मात्याच्या पत्नीने शानवर अरेरावीची भाषा करून त्याला मारहाण केली. त्यांच्या या वादाचे शानने त्याच्या फोनमध्ये चित्रीकरण केले. निर्मात्याच्या पत्नीचा उद्धटपणे बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस निर्मात्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच