'उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार शिवसेनेच्या वाटेवर'

दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्विर्झर्लंडमधील दावोस येथे असलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा केला. लवकरच उद्धव ठाकरे गटाला जबर धक्का बसेल, असेही उदय सामंत म्हणाले. याआधी शिवसेनेचे लोकसभेतील खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याचे भाकीत केले होते. दोन शिवसेना नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरे गटाचे काय होणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या सुमारास उदय सामंत यांचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. उदय सामंत यांनी काँग्रेसचे निवडक आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.



उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना पक्षात फूट पडणार नाही, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्योगमंत्र्यांना फक्त राजकारण करायचे असेल तर त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसमधून परत महाराष्ट्रात पाठवून द्यावे,असेही संजय राऊत म्हणाले.



महाराष्ट्र विधानसभा
एकूण सदस्य २८८
भाजपा १३२
शिवसेना ५७
राष्ट्रवादी काँग्रेस ४१
उद्धव ठाकरे गट २०
काँग्रेस १६
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस १०
समाजवादी पक्ष २
इतर १०

इतर १० जणांपैकी जनसुराज्य शक्तीचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचा १, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचा १ अशा पाच सदस्यांनी राज्यातील महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे. तर समाजवादी पक्षाचे २, एमआयएमचा १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा १, शेतकरी कामगार पक्षाचा १ अशा पाच जणांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाच इतर मिळून २३५ आमदारांची महायुती सत्तेत आहे. तर ५१ आमदार विरोधात आहेत.
Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास