लॉस एँजेलिसमधील वणवा भडकला, आणखी ५० हजार जणांच्या स्थलांतराचे आदेश

लॉस एँजेलिस : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एँजेलिसच्या जंगलात लागलेला वणवा पुन्हा भडकला आहे. वणवा झपाट्याने पसरत असल्यामुळे आणखी ५० हजार नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नव्याने भडकेल्या ह्युजेस फायर नावाच्या वणव्यामुळे अवघ्या काही तासांत ९४०० एकरचे जंगल जळून खाक झाले आहे.



नव्याने भडकलेला वणवा विनाशकारी ईटन आणि पॅलिसेड्स पासून सुमारे ४० किमी. अंतरावर आहे. मागील तीन आठवड्यांपासून वणव्यामुळे लॉस एँजेलिसचे जंगल नष्ट होत आहे.जंगलातील पॅलिसेड्समुळे २३ हजार ४४८ एकर तर इटनमुळे १४ हजार २१ एकर जंगल जळून खाक झाले आहे. पॅलिसेड्स वणवा ६८ टक्के नियंत्रणात आली आहे तर ईटन वणवा ९१ टक्के नियंत्रणात आली आहे. पण नव्याने भडकेला वणवा अद्याप नियंत्रणात आलेला नाही.



याव्यतिरिक्त, सॅन दिएगोमधील लिलाक वणवा ९५ टक्के नियंत्रणात आहे. रिव्हरसाईडमधील क्ले फायर नावाचा वणवा ४५ टक्के नियंत्रणात आहे. या व्यतिरिक्त सॅन दिएगो काउंटी येथे सेंटर फायर नावाचा वणवा भडकला आहे. या वणव्याची सुरुवात बुधवार २२ जानेवारी रोजी झाली. या वणव्याने चार हजार एकरांपेक्षा जास्त जंगल जळून खाक झाले आहे.



ज्या भागांमध्ये वणवा पेटला आहे त्या भागांमध्ये ताशी ४० ते ६० मैल वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्यामुळे वणवा नियंत्रणात आणणे कठीण झाले आहे. पुढील काही तास तर ताशी ७० मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग वाढला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याचा धोका आहे.
Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात