TRAIच्या आदेशानंतर एअरटेलची नरमाईची भूमिका, लाँच केले स्वस्त रिचार्ज प्लान्स

मुंबई: ट्रायच्या आदेशानंतर जिओ आणि एअरटेलने आपले स्वस्त प्लान्स लाँच केले आहेत. कंपनी केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे ऑप्शन आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडत आहेत. या क्रमामध्ये एअरटेलने आपले दोन नवे रिचार्ज प्लान्स ४९९ रूपये आणि १९५९ रूपयांचे प्लान्स लाँच केले आहेत. दोन्ही प्लान्स अनुक्रमे ८४ दिवस आणि ३६५दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतात.


४९९ रूपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस फायद्यांसह येतो. यात तुम्हाला डेटा मिळणार नाही. अतिरिक्त फायद्यांच्या नावावर कंपनी अपोलो २४ बाय ७ सर्कल आणि फ्री हॅलो ट्यूनचा अॅक्सेस देत आहे.


तर दुसरा प्लान १९५९ रूपयांचा आहे. यात तुम्हाला एका वर्षाची म्हणजेच ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात तुम्हाला डेटा बेनेफिट मिळत नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटी देत आहे. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळत आहेत.


डेटा वापरासाठी तुम्हाला दुसरे प्लान्स खरेदी करावे लागतील. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे प्लान लाँच करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहेत. ऑथॉरिटीचे म्हणणे आहे की अनेक युजर्स असे आहेत जे डेटाचा वापर करत नाही. त्यांनाही डेटाचा प्लान घ्यावा लागतो. अशा युजर्ससाठी वेगवेगळे प्लान लाँच करावे लागतील.

Comments
Add Comment

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय