TRAIच्या आदेशानंतर एअरटेलची नरमाईची भूमिका, लाँच केले स्वस्त रिचार्ज प्लान्स

मुंबई: ट्रायच्या आदेशानंतर जिओ आणि एअरटेलने आपले स्वस्त प्लान्स लाँच केले आहेत. कंपनी केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे ऑप्शन आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडत आहेत. या क्रमामध्ये एअरटेलने आपले दोन नवे रिचार्ज प्लान्स ४९९ रूपये आणि १९५९ रूपयांचे प्लान्स लाँच केले आहेत. दोन्ही प्लान्स अनुक्रमे ८४ दिवस आणि ३६५दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतात.


४९९ रूपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस फायद्यांसह येतो. यात तुम्हाला डेटा मिळणार नाही. अतिरिक्त फायद्यांच्या नावावर कंपनी अपोलो २४ बाय ७ सर्कल आणि फ्री हॅलो ट्यूनचा अॅक्सेस देत आहे.


तर दुसरा प्लान १९५९ रूपयांचा आहे. यात तुम्हाला एका वर्षाची म्हणजेच ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात तुम्हाला डेटा बेनेफिट मिळत नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटी देत आहे. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळत आहेत.


डेटा वापरासाठी तुम्हाला दुसरे प्लान्स खरेदी करावे लागतील. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे प्लान लाँच करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहेत. ऑथॉरिटीचे म्हणणे आहे की अनेक युजर्स असे आहेत जे डेटाचा वापर करत नाही. त्यांनाही डेटाचा प्लान घ्यावा लागतो. अशा युजर्ससाठी वेगवेगळे प्लान लाँच करावे लागतील.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले