TRAIच्या आदेशानंतर एअरटेलची नरमाईची भूमिका, लाँच केले स्वस्त रिचार्ज प्लान्स

मुंबई: ट्रायच्या आदेशानंतर जिओ आणि एअरटेलने आपले स्वस्त प्लान्स लाँच केले आहेत. कंपनी केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे ऑप्शन आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडत आहेत. या क्रमामध्ये एअरटेलने आपले दोन नवे रिचार्ज प्लान्स ४९९ रूपये आणि १९५९ रूपयांचे प्लान्स लाँच केले आहेत. दोन्ही प्लान्स अनुक्रमे ८४ दिवस आणि ३६५दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतात.


४९९ रूपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० एसएमएस फायद्यांसह येतो. यात तुम्हाला डेटा मिळणार नाही. अतिरिक्त फायद्यांच्या नावावर कंपनी अपोलो २४ बाय ७ सर्कल आणि फ्री हॅलो ट्यूनचा अॅक्सेस देत आहे.


तर दुसरा प्लान १९५९ रूपयांचा आहे. यात तुम्हाला एका वर्षाची म्हणजेच ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात तुम्हाला डेटा बेनेफिट मिळत नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटी देत आहे. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळत आहेत.


डेटा वापरासाठी तुम्हाला दुसरे प्लान्स खरेदी करावे लागतील. ट्रायने टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे प्लान लाँच करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहेत. ऑथॉरिटीचे म्हणणे आहे की अनेक युजर्स असे आहेत जे डेटाचा वापर करत नाही. त्यांनाही डेटाचा प्लान घ्यावा लागतो. अशा युजर्ससाठी वेगवेगळे प्लान लाँच करावे लागतील.

Comments
Add Comment

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला

Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय