राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.


विधानसभा निवडणुकीत मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली असली, तरी आगामी मनपा निवडणुकीत मनसेला टाळी दिली जाईल, अशी चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील विधानसभेला झालेला पराभव विसरून कामला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. मुंबईनंतर मनसेसाठी नाशिक महत्त्वाची महापालिका आहे.


मनसेने पहिल्यांदाच राज्यात सत्ता नाशिक मनपात बघितली मात्र त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा लागली आणि अंतर्गत गटबाजीने डोके वर काढले आहे. ते पाहता राज ठाकरे यांचा दौरा पक्षासाठी महत्त्वाचा आहे. पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचनादेखील करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये पक्षाचा वर्धापन दिन व अधिवेशन नाशिकला घेतले होते. परंतु लोकसभा निवडणुका न लढवण्याच्या निर्णयामुळे पक्षात नाराजी पाहायला मिळाली होती.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा