Maha Kumbhmela 2025 : महाकुंभ मेळ्यात १०० हून अधिक भाविकांना हृदयविकाराचा झटका!

१८३ लोकांना आयसीयूत उपचार, ५८० जणांवर शस्त्रक्रिया


प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे कुंभ मेळ्याचे (Maha Kumbhmela 202) आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्याला जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या भाविकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक अशी सर्व खबरदारी घेतली जात आहे. महाकुंभ मेळ्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या १०० हून अधिक भाविकांचा जीव वाचवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर १८३ गंभीर आरोग्याविषयी समस्या आलेल्या भाविकांना आयसीयूमध्ये उपचार मिळाले आणि ५८० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.



याव्यतिरिक्त १ लाख ७० हजार ७२७ जणांच्या ब्लड टेस्ट करण्यात आल्या आहेत आणि १ लाख ९९८ लोकांनी ओपीडी सेवांचा लाभ घेतला आहे, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले, महाकुंभ येथील केंद्रीय रुग्णालय लाखो भाविकांची सुरक्षा आणि आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवत आहे असेही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.



जगभरातील भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा


महाकुंभ मेडिकल व्यवस्थेचे नोडल ऑफिसर डॉ. गौरव दुबे यांनी सांगितलं की देशभरातलील तसेच जगभरातील भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात आहे. उपचार घेतलेल्या रुग्णांबद्दल बोलताना दुबे म्हणाले की, मध्य प्रदेशातील दोन भाविकांना छातीत दुखू लागले त्यानंतर त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, त्यांना काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, तसेच त्यांना योग्य उपचार देण्यात आले. सध्या ते पूर्णपणे निरोगी आहेत. दोन्ही रुग्णांची इसीजी करण्यात आली, त्यांना मिळलेल्या प्रभावी उपचारामुळे ते लवकर बरे झाले. इतर रुग्णांमध्ये फुलापूर येथील हनुमानगंजचे रहिवासी १०५ वर्षीय बाबा राम जाने दास यांच्या पोटदुखीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.



१० खाटांचे आयसीयूची उभारणी


जनरल मेडिसीन, डेंटल सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, स्त्रीरोग, बालरोग आणि बालकांच्या आजारांसंबंधी तज्ञांसह इतर अनेक तज्ञ डॉक्टरांची एक टीम मध्यवर्ती रुग्णालयात सेवा देत आहे. तसेच गंभीर प्रकरणांसाठी रुग्णालयात १० खाटांचे आयसीयू उभारण्यात आले आहे. रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या