मणिपूरमध्ये जनता दल संयुक्तच्या प्रदेशाध्यक्षाची हकालपट्टी

इंफाळ : केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या आणि बिहारमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त (Janata Dal United – JDU) पक्षाने मणिपूरमधील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. या घोषणेला काही तास होत नाहीत तोच एक धक्कादायक घटना घडली. जनता दल संयुक्तच्या केंद्रीय नेतृत्वाने मणिपूरमधील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. मणिपूरमधील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने केंद्रीय नेतृत्वाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला, असे कारण देत कारवाई करण्यात आली. जनता दल संयुक्तचा मणिपूरमधील भाजपा सरकारला असलेला पाठिंबा कायम आहे. रालोआतून बाहेर पडण्याचा पक्षाचा विचार नाही, असेही जनता दल संयुक्तकडून जाहीर करण्यात आले.



जनता दल संयुक्तच्या सरकारला पाठिंबा कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे मणिपूरमधील मुख्यमंत्री बदलाचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. याआधी जनता दल संयुक्तच्या निर्णयाचे निमित्त करुन भारतीय जनता पार्टी मणिपूरमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा विचार करण्याची शक्यता व्यक्त होत होती.

मणिपूरमध्ये ६० सदस्यांची विधानसभा आहेत. या सभागृहात रालोआचे ४५ आमदार आहेत. यात भाजपाचे ३७, नागा पीपल्स फ्रंटचे पाच आणि तीन अपक्ष आमदार आहेत. जनता दल संयुक्तचा एकमेव आमदार सरकारसोबत असल्यास रालोआच्या राज्यातील आमदारांची संख्या ४६ होणार आहे. नॅशनल पीपल्स पार्टीचे सहा, काँग्रेसचे पाच, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन असे १३ आमदार विरोधात आहेत. सभागृहातील एक जागा रिक्त आहे.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला