IND vs ENG: कोलकातामध्ये रंगणार भारत वि इंग्लंड पहिला टी-२० सामना, किती वाजता सुरू होणार सामना जाणून घ्या डिटेल्स...

  226

मुंबई: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यात पहिला टी-२० सामना आज म्हणजेच २२ जानेवारीला बुधवारी कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाईल. दोन्ही संघादरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. याची सुरूवात आजपासून होत आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करताना दिसेल. तर जोस बटलर इंग्लंडचा कर्णधार असेल. दोन्ही संघादरम्यान चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा आहे.



कधी असणार सामना?


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना आज म्हणजेच २२ जानेवारीला बुधवारी खेळवला जात आहे. सामन्याची सुरूवात ७ वाजता होईल. तर टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच साडेसहा वाजता होईल.



कुठे रंगणार सामना


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर रंगणार आहे.



टीव्हीवर कुठे पाहा लाईव्ह?


भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाणारा पहिला टी-२० सामना भारतात स्टार स्पोर्ट्सच्या नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे.



टी२० मालिकेसाठी भारतीय संघ


सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वाशिंगटन सुंदर, ध्रुव जुरेल.



टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ


बेन डकेट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, जेमी ओवरटन, जॅकब बेथल, लियाम लिव्हिंगस्टोन, जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, आदिल रशीद, ब्रायडन कार्स, गस एटकिंसन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, रेहान अहमद, साकिब महमूद.



Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे