Karnataka Accident : फळं-भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून चक्काचूर!

  67

१० जणांचा जागीच मृत्यू, तर १५ जण गंभीर जखमी


बंगळूरू : कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळळ्याची घटना घडली आहे. यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. अपघात झालेल्या ट्रकमधून भाजीपाला आणि फळं विक्रीसाठी घेऊण जाणारे व्यापारी प्रवास करत होते. राष्ट्रीय महामार्गावर गुलापुरा येथे भाजीपाला आणि फळं घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे रस्त्यावर धुके असल्याने नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक ट्रिपरवर आदळून थेट ५० मीटर दरीत कोसळला. या अपघातामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला आहे.


दरम्यान, सदर घटनास्थळी यल्लापुर पोलीस स्थानकाचे अधिकारी तपासासाठी पोहोचले असून क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख नारण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अपघाताबद्दल माहिती संकलित केली. पोलिसांकडून अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )