Karnataka Accident : फळं-भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून चक्काचूर!

१० जणांचा जागीच मृत्यू, तर १५ जण गंभीर जखमी


बंगळूरू : कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळळ्याची घटना घडली आहे. यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. अपघात झालेल्या ट्रकमधून भाजीपाला आणि फळं विक्रीसाठी घेऊण जाणारे व्यापारी प्रवास करत होते. राष्ट्रीय महामार्गावर गुलापुरा येथे भाजीपाला आणि फळं घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे रस्त्यावर धुके असल्याने नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक ट्रिपरवर आदळून थेट ५० मीटर दरीत कोसळला. या अपघातामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला आहे.


दरम्यान, सदर घटनास्थळी यल्लापुर पोलीस स्थानकाचे अधिकारी तपासासाठी पोहोचले असून क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख नारण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अपघाताबद्दल माहिती संकलित केली. पोलिसांकडून अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची