Karnataka Accident : फळं-भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून चक्काचूर!

१० जणांचा जागीच मृत्यू, तर १५ जण गंभीर जखमी


बंगळूरू : कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळळ्याची घटना घडली आहे. यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. अपघात झालेल्या ट्रकमधून भाजीपाला आणि फळं विक्रीसाठी घेऊण जाणारे व्यापारी प्रवास करत होते. राष्ट्रीय महामार्गावर गुलापुरा येथे भाजीपाला आणि फळं घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे रस्त्यावर धुके असल्याने नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक ट्रिपरवर आदळून थेट ५० मीटर दरीत कोसळला. या अपघातामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला आहे.


दरम्यान, सदर घटनास्थळी यल्लापुर पोलीस स्थानकाचे अधिकारी तपासासाठी पोहोचले असून क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख नारण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अपघाताबद्दल माहिती संकलित केली. पोलिसांकडून अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने