Arshdeep Singh: अर्शदीप सिंहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

मुंबई: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने(Arshdeep Singh) ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी इंग्लंडविरुद्ध कोलकाता टी-२०मध्ये मंगळवारी केली आहे.


इंग्लंडविरुद्ध सामन्यात त्याने २ विकेट घेत इतिहास रचला. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत युझवेंद्र चहलला मागे टाकले आहे. चहलच्या ८० सामन्यांत ९६ विकेट आहेत. अर्शदीपने ६१व्या सामन्यात हे यश मिळवले.



१०० विकेट घेण्याच्या जवळ अर्शदीप


या रेकॉर्डच्या बाबतीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार खूप मागे आहेत. आता अर्शदीप ऐतिहासिक शतकाच्या जवळ पोहोचला आहे. म्हणजेच आतापर्यंत एकाही भारतीयाला हे जमलेले नाही.



सर्वाधिक टी-२० विकेट घेणारे भारतीय


९७ विकेट - अर्शदीप सिंह(६१ सामने)
९६ विकेट - युझवेंद्र चहल(८०)
९० विकेट - भुवनेश्वर कुमार(८७)
८९ विकेट - जसप्रीत बुमराह(७०)
८९ विकेट - हार्दिक पांड्या(११०)



साल्ट आणि डकेटला बाद करत केला रेकॉर्ड


अर्शदीप सिंहने कोलकातामधील सामन्यात इंग्लंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. त्याने पहिल्याच षटकांत फिल साल्टला बळी बनवले. त्यानंतर डावाच्या तिसऱ्या षटकांत बेन डकेटला रिंकु सिंहच्या हाती धावबाद केले.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून