Arshdeep Singh: अर्शदीप सिंहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

मुंबई: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने(Arshdeep Singh) ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी इंग्लंडविरुद्ध कोलकाता टी-२०मध्ये मंगळवारी केली आहे.


इंग्लंडविरुद्ध सामन्यात त्याने २ विकेट घेत इतिहास रचला. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत युझवेंद्र चहलला मागे टाकले आहे. चहलच्या ८० सामन्यांत ९६ विकेट आहेत. अर्शदीपने ६१व्या सामन्यात हे यश मिळवले.



१०० विकेट घेण्याच्या जवळ अर्शदीप


या रेकॉर्डच्या बाबतीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार खूप मागे आहेत. आता अर्शदीप ऐतिहासिक शतकाच्या जवळ पोहोचला आहे. म्हणजेच आतापर्यंत एकाही भारतीयाला हे जमलेले नाही.



सर्वाधिक टी-२० विकेट घेणारे भारतीय


९७ विकेट - अर्शदीप सिंह(६१ सामने)
९६ विकेट - युझवेंद्र चहल(८०)
९० विकेट - भुवनेश्वर कुमार(८७)
८९ विकेट - जसप्रीत बुमराह(७०)
८९ विकेट - हार्दिक पांड्या(११०)



साल्ट आणि डकेटला बाद करत केला रेकॉर्ड


अर्शदीप सिंहने कोलकातामधील सामन्यात इंग्लंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. त्याने पहिल्याच षटकांत फिल साल्टला बळी बनवले. त्यानंतर डावाच्या तिसऱ्या षटकांत बेन डकेटला रिंकु सिंहच्या हाती धावबाद केले.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील