मुंबई: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने(Arshdeep Singh) ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी इंग्लंडविरुद्ध कोलकाता टी-२०मध्ये मंगळवारी केली आहे.
इंग्लंडविरुद्ध सामन्यात त्याने २ विकेट घेत इतिहास रचला. तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत युझवेंद्र चहलला मागे टाकले आहे. चहलच्या ८० सामन्यांत ९६ विकेट आहेत. अर्शदीपने ६१व्या सामन्यात हे यश मिळवले.
या रेकॉर्डच्या बाबतीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार खूप मागे आहेत. आता अर्शदीप ऐतिहासिक शतकाच्या जवळ पोहोचला आहे. म्हणजेच आतापर्यंत एकाही भारतीयाला हे जमलेले नाही.
९७ विकेट – अर्शदीप सिंह(६१ सामने)
९६ विकेट – युझवेंद्र चहल(८०)
९० विकेट – भुवनेश्वर कुमार(८७)
८९ विकेट – जसप्रीत बुमराह(७०)
८९ विकेट – हार्दिक पांड्या(११०)
अर्शदीप सिंहने कोलकातामधील सामन्यात इंग्लंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. त्याने पहिल्याच षटकांत फिल साल्टला बळी बनवले. त्यानंतर डावाच्या तिसऱ्या षटकांत बेन डकेटला रिंकु सिंहच्या हाती धावबाद केले.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…