Virat Kohli: विराट कोहलीचा चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा निर्णय

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ठीक आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत(Virat Kohli) मोठी बातमी समोर आली आहे. कोहली लवकरच रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माही या स्पर्धेत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे.


यातच आणखी एक बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. सूत्रांच्या मते कोहलीने डीडीसीएला सांगितले की तो रेल्वेविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. दिल्लीचा संघ रेल्वेविरुद्ध ३० जानेवारीपासून सामना खेळणार आहे. कोहली या सामन्यात खेळताना दिसेल.


कोहली रेल्वेविरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरल्यानंतर त्याचा १३ वर्षांनी पहिला रणजी सामना असेल. कोहली शेवटचा २०१२मध्ये रणजी सामन्यात खेळला होता. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध गाझियाबाद येथे शेवटचा रणजी सामना खेळला होता. दिल्लीचा संघ रणजीमध्ये आपला पुढील सामना २३-२५ जानेवारीदरम्यान सौराष्ट्रविरुद्ध राजकोटमध्ये खेळणार आहे. कोहली हा सामना खेळणार नाही.


विराट कोहलीचा फॉर्म बिघडला


कोहली रेड बॉल फॉरमॅटमध्ये खराब फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे त्याला टीकाकारांचाही सामना करावा लागला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मध्ये त्याने पर्थमध्ये कसोटी शतक ठोकले. तर ९ डावांमध्ये २३.७५च्या सरासरीने १९० धावा केल्या. तसेच ८ वेळा कॅच आऊट झाला.

Comments
Add Comment

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने