Virat Kohli: विराट कोहलीचा चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा निर्णय

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ठीक आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत(Virat Kohli) मोठी बातमी समोर आली आहे. कोहली लवकरच रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माही या स्पर्धेत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे.


यातच आणखी एक बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. सूत्रांच्या मते कोहलीने डीडीसीएला सांगितले की तो रेल्वेविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. दिल्लीचा संघ रेल्वेविरुद्ध ३० जानेवारीपासून सामना खेळणार आहे. कोहली या सामन्यात खेळताना दिसेल.


कोहली रेल्वेविरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरल्यानंतर त्याचा १३ वर्षांनी पहिला रणजी सामना असेल. कोहली शेवटचा २०१२मध्ये रणजी सामन्यात खेळला होता. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध गाझियाबाद येथे शेवटचा रणजी सामना खेळला होता. दिल्लीचा संघ रणजीमध्ये आपला पुढील सामना २३-२५ जानेवारीदरम्यान सौराष्ट्रविरुद्ध राजकोटमध्ये खेळणार आहे. कोहली हा सामना खेळणार नाही.


विराट कोहलीचा फॉर्म बिघडला


कोहली रेड बॉल फॉरमॅटमध्ये खराब फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे त्याला टीकाकारांचाही सामना करावा लागला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मध्ये त्याने पर्थमध्ये कसोटी शतक ठोकले. तर ९ डावांमध्ये २३.७५च्या सरासरीने १९० धावा केल्या. तसेच ८ वेळा कॅच आऊट झाला.

Comments
Add Comment

Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी विजेता होणार मालामाल; फॉर्च्युनर कारसह मिळणार लाखोंची बक्षिसे

कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच

IPL 2026 : हर्षितनंतर आकाश दीपदेखील संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर

आयपीएल २०२६ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हर्षित राणानंतर,

IPL 2026 : आयपीएल २०२६ ला दुखापतींचं ग्रहण; अनेक क्रिकेटपटूंच्या दुखापतींमुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच, अनेक संघ दुखापतींशी झुंजत आहेत. १० पैकी आठ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच