IND Vs ENG: सूर्याच्या नेतृत्वात आतापर्यंत नाही झाला भारताचा पराभव...पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध मालिका

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आता आपल्या पुढील मिशनच्या अगदी जवळ आला आहे. संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. याचा पहिला सामना २२ जानेवारीला कोलकाताच्या इडन गार्डनवर रंगणार आहे. या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव नेतृत्व करत आहे.

कर्णधार म्हणून सूर्याची आपल्या करिअरमधील सहावी द्वीपक्षीय टी-२० मालिका आहे. त्याच्या नेतृत्वात आतापर्यंत जबरदस्त रेकॉर्ड राहिला आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला अद्याप एकही पराभव मिळालेला नाही. सोबतच सूर्या इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत पहिल्यांदा नेतृत्व करत आहे.

सूर्याच्या नेतृत्वात या ४ संघाना दिली मात


सूर्यकुमार यादवला पहिल्यांदा नेतृत्व करण्याची संधी २०२३मध्ये मिळाली होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिकेचे नेतृत्व केले होते. पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ४-१ अशी बाजी मारली होती. यानंतर सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघांचा विजयरथ पुढे चालत राहिला.

ऑस्ट्रेलियानंतर सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा दौरा केला. येथे २ सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर २-० असे हरवले. तर बांगलादेशला ३-० असे क्लीन स्वीप केले.

सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने शेवटची टी-२० मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबर २०२४मध्ये खेळली होती. चार सामन्यांच्या या मालिकेत द्वीपक्षीय टी-२० मालिका भारतीय संघाने ३-१ अशी आपल्या नावे केली होती. आता सूर्यासमोर इंग्लंड संघाचे आव्हान आहे.
Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.