छत्तीसगड : चकमकीत एकूण २७ नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी चकमकीत आतापर्यंत २७ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत पोलिसांनी १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगितले.


छत्तीसगडमधून नक्षलवादाचे समूळ उच्चाटनाच्या दिशेने सरकारने कंबर कसली आहे. त्यानुसार सुक्षादलाच्या १००० जवानांनी छत्तीसगड- ओडिशा सीमेवरील गरियाबंद येथे नक्षलवाद्यांना घेराव घालतला. यावेळी सुरक्षा दलांनी नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. मात्र नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर पोलिसांनी सडेतोड प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांचा मुकाबला सुरू केला. या प्रदीर्घ चकमकीत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.


यापरिसरात अजूनही पोलिसांची कारवाई सुरूच असून आणखी नक्षलवादी या ठिकाणी असल्याची माहिती समोर आली आहे. ठार केलेल्या २७ नक्षलवाद्यांपैकी १६ जणांचे मृतदेह ताब्यात घेत त्यांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या चकमकीत 1 कोटींचे बक्षीस असलेला जयराम उर्फ ​​चलपती ठार झाला असून यासह सीसीएम मनोज आणि गुड्डू नक्षलवादीही ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती रायपूर झोनचे आयजी अमरेश मिश्रा यांनी दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही नक्षलवादी या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षादल हा परिसर पिंजून काढत आहेत.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर