संजय रॉयला जन्मठेप, ममता बॅनर्जी नाराज

कोलकाता : आर. जी. कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (दुखापतीमुळे मृत्यू), कलम ६६ (बलात्कार) आणि कलम १०३ (१) (हत्या) अंतर्गत संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपयांची भरपाई द्या, असेही निर्देश दिले. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी हा निर्णय दिला. हा निर्णय जाहीर होताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्यांनी त्यांची नाराजी जाहीर केली.



आरोपीने केलेले कृत्य बघता त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी त्यांची नाराजी जाहीर केली. पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीही आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. 'भरपाईची रक्कम आमचे दुःख कमी करू शकत नाही. घरातील गमावलेला सदस्य परत येणार नाही, यामुळे भरपाई नको'; अशा शब्दात पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.



सीबीआयच्या वकिलाने हा दुर्मिळ गुन्हा असल्यामुळे दोषी आरोपीसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली. ही मागणी फेटाळताना न्यायाधीशांनी गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे हे मान्य केले पण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा मुद्दा मान्य केला नाही. सियालदह न्यायालयाने १६२ दिवसांत निर्णय देऊन खटल्याचे कामकाज पूर्ण केले.

प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयातही एक खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल अद्याप आलेला नाही.

नेमके काय घडले होते ?

कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह ९ ऑगस्ट २०२४ रोजी आढळला होता. या प्रकरणात संजय रॉय याला अटक झाली. हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे संजय रॉय विरोधात खटला चालवण्यात आला. अखेर सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

 
Comments
Add Comment

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या