संजय रॉयला जन्मठेप, ममता बॅनर्जी नाराज

कोलकाता : आर. जी. कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (दुखापतीमुळे मृत्यू), कलम ६६ (बलात्कार) आणि कलम १०३ (१) (हत्या) अंतर्गत संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपयांची भरपाई द्या, असेही निर्देश दिले. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी हा निर्णय दिला. हा निर्णय जाहीर होताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्यांनी त्यांची नाराजी जाहीर केली.



आरोपीने केलेले कृत्य बघता त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी त्यांची नाराजी जाहीर केली. पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीही आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. 'भरपाईची रक्कम आमचे दुःख कमी करू शकत नाही. घरातील गमावलेला सदस्य परत येणार नाही, यामुळे भरपाई नको'; अशा शब्दात पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.



सीबीआयच्या वकिलाने हा दुर्मिळ गुन्हा असल्यामुळे दोषी आरोपीसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली. ही मागणी फेटाळताना न्यायाधीशांनी गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे हे मान्य केले पण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा मुद्दा मान्य केला नाही. सियालदह न्यायालयाने १६२ दिवसांत निर्णय देऊन खटल्याचे कामकाज पूर्ण केले.

प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयातही एक खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल अद्याप आलेला नाही.

नेमके काय घडले होते ?

कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह ९ ऑगस्ट २०२४ रोजी आढळला होता. या प्रकरणात संजय रॉय याला अटक झाली. हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे संजय रॉय विरोधात खटला चालवण्यात आला. अखेर सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

 
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च