Torres : टोरेस घोटाळा प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी!

  92

मुंबई : टोरेस घोटाळा (Torres Scam) प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. व्हैलेन्टीना कुमार, तानिया आणि सर्वेश सुर्वे या तिघांना मुंबई सत्र न्यायालयात रिमांडसाठी शनिवारी हजर करण्यात आले होते. या सुनावणी दरम्यान कोर्टाने निरिक्षण नोंदवत चौकशी पूर्ण झाल्याने अधिक रिमांडची गरज नसल्याचे म्हटले आहे. तर आरोपी व्हॅलेंटिना कुमार आणि सर्वेश सर्वे आता जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.



सन्माननीय विशेष न्यायालय मुंबईच्या सत्र न्यायालयाने टोरेस गैरव्यवहार प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना ३० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या खटल्यातील व्हैलेन्टीना कुमार आणि सर्वेश सुर्वे यांच्यासाठी मी एड. रवी जाधव, राजेश टेके आणि इतर सहकारी त्यामध्ये पात्र झालो असून आगामी काळात आम्ही या संदर्भात बेल अर्ज दाखल करू अशी माहिती अॅड. रवी जाधव यांनी दिली आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झालेल्या २ हजारहून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला आहे.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी