Free Travel : जाणून घ्या कोणाला मिळणार तेजस, वंदे भारतसह हमसफरचा मोफत प्रवास?

मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) एलटीसीअंतर्गत (LTC) सरकारी कर्मचाऱ्यांना वंदे भारत एक्स्प्रेस, हमसफर आणि तेजस सारख्या लक्झरी ट्रेनमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३८५ गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय आहे. ज्यात १३६ वंदे भारत एक्स्प्रेस, ९७ हमसफर व ८ तेजस एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यापूर्वी, ते राजधानी, शताब्दी व दुरांतोसारख्या १४४ हाय-एंड ट्रेनमध्ये एसी प्रवासाचा आनंद घेऊ शकत होते. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) देशातील सर्व भागांत एलटीसी प्रवास बुकिंगसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. कार्मिक व प्रशिक्षण विभागाला एलटीसीअंतर्गत वेगवेगळ्या प्रीमियम ट्रेन्सबाबत सर्व कार्यालये व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनंतर हा निर्णय घेण्यात आला.



सर्व स्तरावरील सरकारी कर्मचारी अत्याधुनिक वंदे भारत, तेजस आणि हमसफर एक्स्प्रेसमध्ये जागतिक स्तरावरील प्रवासाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या निर्णयानुसार आता कर्मचारी २४१ अतिरिक्त गाड्यांसाठी एलटीसी वापरू शकतात. या निर्णयामुळे, देशातील सर्व प्रदेशांमध्ये एकूण ३८५ गाड्या असतील जिथे त्या धावत आहेत. ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एलटीसी प्रवासासाठी तिकिटे बुक करता येतील.


सरकारी कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार, एलटीसी अंतर्गत तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि हमसफर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. एलटीसीचा लाभ घेणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी तिकिटांवर झालेला खर्चही परत मिळतो. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना जम्मू व काश्मीर, लडाख, अंदमान व निकोबार बेटे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी रजा प्रवास सवलत मिळण्यासाठी योजना दोन वर्षांसाठी वाढवली होती.
आता ही योजना २६ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू असेल. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचारी या निवडक ठिकाणी प्रवास करण्यासाठी त्यांच्या होम टाऊन एलटीसीची देवाण-घेवाण करू शकतात. वंदे भारत, तेजस व शताब्दी एक्स्प्रेस या तीन गाड्यांमधील ११ व त्याखालील स्तरावरील कर्मचारी छोट्या व मध्यम अंतराच्या रेल्वे प्रवासात चेअर कारचाही वापर ते करू शकतात.

Comments
Add Comment

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे