आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट

ढाका : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट निघाले आहे. बांग्लादेश क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या शाकिब अल हसन विरोधात अटक वॉरंट निघाले आहे.



चेक बाऊन्स झाल्यामुळे बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांतर्गत शाकिब अल हसन विरोधात अटक वॉरंट निघाले आहे. न्यायालयाने शाकिब अल हसन विरोधात अटक वॉरंट काढले आहे. क्रिकेटमध्ये उत्तम कारकिर्द असलेल्या शाकिब अल हसनचे वैयक्तिक आयुष्यातले वर्तन अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ताज्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे शाकिब अल हसन अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ७१ कसोटी सामन्यात ४,६०९ धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. कसोटीत एका डावात फलंदाजी करताना शाकीबने २१७ धावा ही वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २४७ सामने खेळत ७,५७० धावा केल्या आहेत. यात त्याने केलेल्या नऊ शतकांचा आणि ५६ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद १३४ धावा ही शाकीबची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. शाकीबने १२९ आंतरराष्ट्रीय टी - ट्वेंटी सामने खेळून २५५१ धावा केल्या आहेत. त्याने टी - ट्वेंटीमध्ये १३ अर्धशतके झळकावली आहेत.



शाकीबने कसोटी क्रिकेटमध्ये २४६, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३१७ आणि टी - ट्वेंटीमध्ये १४९ बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये शाकीबने १९ वेळा एका डावात पाच बळी घेण्याची किमया केली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार वेळा आणि टी - ट्वेंटीमध्ये दोन वेळा एका डावात पाच बळी घेण्याची किमया केली आहे. शाकीबने दोन आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात दहा बळी घेण्याची किमया साधली आहे.
Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे