Ladki Bahin Yojna : तब्ब्ल ४ हजार लाडक्या बहिणींनी योजनेतून काढता पाय घेतला

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली. अशातच आता या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी तब्बल चार हजार लाडक्या बहिणींनी हे फॉर्म परत घेतले आहेत. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेतून काढता पाय घ्यावा लागला आहे.


विधानसभेत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची निवडणुकीआधीच सुरुवात झाली होती. मात्र त्या वेळेस योग्यरित्या अर्जाची छाननी न केल्याने अपात्र महिलांनाही या योजनेचा लाभ घेता आला आहे. त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला. महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. त्यानंतर आता महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं सगळ्या अर्जांची पुन्हा छाननी सुरु केली आहे.



निकषात बसत नसतानाही अर्ज करणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिला अर्ज पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अपात्र ठरल्यास आतापर्यंत मिळालेली लाभाची रक्कम दंडासह वसूल करण्यात येईल, अशी भीती अनेक महिलांना वाटते. त्यामुळेच त्यांनी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. अर्ज मागे घेणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत ४ हजार महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत.



अदिती तटकरे काय म्हणाल्या ??


महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या 'योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले पैसे परत घेण्याचा आमचा विचार नाही. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरलेल्या महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या महिला अपात्र ठरतील. त्यांना पुढील हफ्ते मिळणार नाहीत. अन्य लाभार्थ्यांना जानेवारीच्या अखेरीस पुढील हफ्ता मिळेल,'

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता