Ladki Bahin Yojna : तब्ब्ल ४ हजार लाडक्या बहिणींनी योजनेतून काढता पाय घेतला

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली. अशातच आता या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी तब्बल चार हजार लाडक्या बहिणींनी हे फॉर्म परत घेतले आहेत. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेतून काढता पाय घ्यावा लागला आहे.


विधानसभेत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची निवडणुकीआधीच सुरुवात झाली होती. मात्र त्या वेळेस योग्यरित्या अर्जाची छाननी न केल्याने अपात्र महिलांनाही या योजनेचा लाभ घेता आला आहे. त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला. महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. त्यानंतर आता महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं सगळ्या अर्जांची पुन्हा छाननी सुरु केली आहे.



निकषात बसत नसतानाही अर्ज करणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिला अर्ज पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अपात्र ठरल्यास आतापर्यंत मिळालेली लाभाची रक्कम दंडासह वसूल करण्यात येईल, अशी भीती अनेक महिलांना वाटते. त्यामुळेच त्यांनी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. अर्ज मागे घेणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत ४ हजार महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत.



अदिती तटकरे काय म्हणाल्या ??


महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या 'योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले पैसे परत घेण्याचा आमचा विचार नाही. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरलेल्या महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या महिला अपात्र ठरतील. त्यांना पुढील हफ्ते मिळणार नाहीत. अन्य लाभार्थ्यांना जानेवारीच्या अखेरीस पुढील हफ्ता मिळेल,'

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच