High Security Number Plate : वाहनांना ३० मार्चपूर्वी ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट अनिवार्य !

ठाणे : बनावट नंबर प्लेट लाऊन होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबर प्लेट वरून वाहनाची खरी ओळख पटविण्यासाठी मोठा अडथळा ठरतो आहे, यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट" बसविणे अनिवार्य केलं आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत कडक धोरण अवलंबले असून ३० मार्च २०२५ पर्यंत ठाण्यातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक रहाणार आहे.



व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या


ठाण्यात व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या असल्याचा आभास होतो. रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे हे देखील समजून येत नाही कधी नंबर प्लेट नसणारी किंवा खोट्या नंबर प्लेट लावून वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र अशा वाहनांचा कळत नकळत एखादा गुन्हा घडला, तर त्याला शोधणे खूप अवघड होऊन जाते. अशा नंबर प्लेट वरून राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठण्यसारखी परिस्थिती देशभरात असून याच पार्श्वभूमीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांना "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट" लावण्याची सूचना केली आहे. या बाबत राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व वाहनांना ३० मार्च २०२५ पूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.



प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई


ठाण्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी जी वाहने आहेत अशा सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायची आहे. या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. अनधिकृत विक्रेत्याकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनाची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेस मध्ये होणार नाही. यामुळे १ एप्रिल २०२५ नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते असे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले आहे

Comments
Add Comment

चोरीला गेलेले फोन मिळणार परत, दिल्ली पोलिसांचे मिशन रीकनेक्ट ३.० नेमकं आहे तरी काय?

दिल्ली: दिल्लीमध्ये मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये, दिल्ली पोलिसांच्या ट्रान्सपोर्ट रेंजने मिशन

चेक बऊन्सप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर राजपालचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : तिहारमधून बाहेर आल्यानंतर अभिनेता राजपाल यादव तातडीने उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे त्याच्या

सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला

‘दो दीवाने सहर में’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; मृणाल ठाकुर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या अनोख्या प्रेमकथेचा मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा

मुंबई : Zee Studios आणि Bhansali Productions यांच्या आगामी रोमँटिक ड्रामा ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये

“लल्ला… तैयार रहना!”: Amazon Prime Video कडून ‘सुबेदार’मधील दमदार नव्या गाण्याचे अनावरण

मुंबई : ‘लल्ला अँथम : अ वॉर्निंग फ्रॉम सुबेदार’ला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर Amazon Prime Video आणि T-Series यांनी आज

Chhatrapati Sambhajinagar: पत्नी माहेरी न दिसल्याने पतीने थेट सासरवाडी गाठली अन्...

छत्रपती संभाजीनगर: पत्नी माहेरी न दिसल्याने पती संतापला आणि थेट मध्यरात्री सासरवाडी गाठली. कौटुंबिक वादाच्या