High Security Number Plate : वाहनांना ३० मार्चपूर्वी ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट अनिवार्य !

  191

ठाणे : बनावट नंबर प्लेट लाऊन होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबर प्लेट वरून वाहनाची खरी ओळख पटविण्यासाठी मोठा अडथळा ठरतो आहे, यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट" बसविणे अनिवार्य केलं आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत कडक धोरण अवलंबले असून ३० मार्च २०२५ पर्यंत ठाण्यातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक रहाणार आहे.



व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या


ठाण्यात व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या असल्याचा आभास होतो. रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे हे देखील समजून येत नाही कधी नंबर प्लेट नसणारी किंवा खोट्या नंबर प्लेट लावून वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र अशा वाहनांचा कळत नकळत एखादा गुन्हा घडला, तर त्याला शोधणे खूप अवघड होऊन जाते. अशा नंबर प्लेट वरून राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठण्यसारखी परिस्थिती देशभरात असून याच पार्श्वभूमीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांना "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट" लावण्याची सूचना केली आहे. या बाबत राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व वाहनांना ३० मार्च २०२५ पूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.



प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई


ठाण्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी जी वाहने आहेत अशा सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायची आहे. या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. अनधिकृत विक्रेत्याकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनाची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेस मध्ये होणार नाही. यामुळे १ एप्रिल २०२५ नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते असे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले आहे

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ