नितेश राणेंच्या निर्देशानंतर मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभाग रत्नागिरी यांना दिले होते. हे निर्देश मिळताच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत अनधिकृत बांधकाम स्वतः हटवा अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाने मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली आहे. मंत्री नितेश राणे यांनी पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले आहेत.



मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे आहे. या सरकारी जागेत खासगी बांधकामांना सक्त मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करत ३१९ अनधिकृत बांधकामं झाली आहेत. ही बांधकामं हटवण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. प्रशासनाने कारवाई केली तर ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांच्याकडूनच बांधकाम हटवण्याचा खर्च वसूल केला जाणार आहे. नियोजीत विकासकामांतील अडथळे दूर करण्यासाठी अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सुरू झाले आहे.



मिरकरवाडा बंदराच्या ११ हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन विकासकामं केली जाणार आहेत. बंदरात ३०० ट्रॉलर्स आणि २०० पर्ससीन नौका अशा एकूण ५०० नौका उभ्या राहतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. याकरिता बंदरातील जागा मोकळी करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार