Maharashtra Weather : थंडीचा जोर ओसरला,राज्यात ढगाळ वातावरण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका कमी झालेला दिसून येतोय. राज्यात ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. अनेक ठिकाणी मळभाचे वातावरण तयार झाले आहे.आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असणार आहे. कमाल तापमानातही २ ते ३ अंशानी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.


गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यामध्येही तापमानामध्ये चढउतार होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान असेच राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.



अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वाऱ्यांची स्थिती बदलली आहे. यामुळे तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अशा वातावरणातील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. ढगाळ वातावरण अथवा अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे.


दुसरीकडे उत्तर भारतात हिमवृष्टी होत आहे. तेथील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी तसेच धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी राज्यात मात्र दिवसा तापमानात वाढ पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील काही परिसर फेरीवालामुक्त ठेवणारच; महापालिका आयुक्तांनी दिले तीव्र कारवाईचे निर्देश

मुंबई: मुंबई महानगराची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे

मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्‍या विपुल दोशी

मुंबई: मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची यांची सोमवारी २३ फेब्रुवारी

तीन वर्षांनंतर प्रथमच स्वीकारणार स्थायी समिती अध्यक्ष स्वीकारणार महापालिका अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प येत्या बुधवारी मांडला जाणार असून तब्बल तीन वर्षांनतर

महापालिकेत भाजपकडून छेडा,सिंह,कर्पे, दळवी, तर शिवसेनेकडून ब्रीद, सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार असून या दहा जागांसाठी

रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची सदिच्छा भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौर वांगले कॅमेरे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती

'गाडगेबाबांचा जीवन संदेश आचरणात आणण्याची गरज'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा, गोरगरीब रुग्णांची सेवा,