'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या जनरल मॅनेजरचे निधन

पुणे : 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक) अतुल जोशी यांचे निधन झाले. अतुल जोशी यांनी ४० वर्ष 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळल्या होत्या. बँकेच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान होते. 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या व्यवस्थापनाने एनएसई आणि बीएसईच्या अधिकाऱ्यांना नियमानुसार जनरल मॅनेजर अतुल जोशी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. एनएसई आणि बीएसईच्या अधिकाऱ्यांनीही अतुल जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच दुःख व्यक्त केले.

'बँक ऑफ महाराष्ट्र'ला १४०६ कोटींचा तिमाही नफा

'बँक ऑफ महाराष्ट्र'ला ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत १४०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. बँकेने या तिमाहीत ७११२ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले. 'बँक ऑफ महाराष्ट्र'ने ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ६३२५ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवले. बँकेच्या एकूण बुडीत कर्जांमध्ये (ग्रॉस एनपीए) घट होऊन ते १.८० टक्क्यांवर घसरले आहे. तसेच निव्वळ बुडीत कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण ०.२ टक्क्यांवर घसरले आहे.

 
Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या