Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शनिवारी होणार टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या डिटेल्स

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy 2025) हळू हळू जवळ येत आहे. स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. मात्र अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. आता बीसीसीआय घोषणा करण्यासाठी पूर्णपणे तयारी करत आहे. उद्या म्हणजेच शनिवारी चॅम्पियन्स ट्ऱॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिका खेळणार आहे. यात पाच टी-२० आणि ३ वनडे सामने खेळवले जाणार आहेत. टी-२० मालिकेची सुरूवात २२ जानेवारीला होईल. यासाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. मात्र वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होणे बाकी आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा एकत्र केली जाईल.


सिलेक्शन मीटिंगनंतर पत्रकार परिषद होईल. ही पत्रकार परिषद दुपारी साडे बारा वाजता होईल. या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य सिलेक्टर अजित आगरकर भाग घेतील.



फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवली जाईल चॅम्पियन्स ट्रॉफी


चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात १९ फेब्रुवारीला होत आहे. तर स्पर्धेचा शेवटचा सामना ९ मार्चला होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. दरम्यान, टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. स्पर्धेतसाठी ८ संघांना २ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. यात ग्रुप ए आणि ग्रुप बी सामील आहे. टीम इंडियाला ग्रुप एमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंडसोबत ठेवण्यात आले आहे. टीम इंडियाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळेल.



२०१३मध्ये भारताने जिंकला होता चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब


टीम इंडियाने २०१३मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब जिंकला होता. यानंतर २०१७मध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

Comments
Add Comment

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत

ICC Womens World Cup 2025 : थरार निश्चित! ICC महिला विश्वचषक उपांत्य फेरीसाठी ४ 'बलाढ्य' संघ फिक्स; फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाचा सामना कुणासोबत?

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार आता संपला आहे. साखळी

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ICU मध्ये दाखल; डॉक्टरांनी सांगितले अंतर्गत रक्तस्रावाचे कारण!

सिडनी : भारतीय वनडे क्रिकेट संघाचा (Indian ODI Team) उपकर्णधार (Vice-Captain) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी