अश्लिल चाळे थांबविण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची भाजपाची मागणी

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर दोनमधील परिसरात कॉलेजवयीन युवक-युवतींकडून भर रस्त्यावर सुरु असलेले अश्लिल चाळे बंद करण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची लेखी मागणी भाजयुमाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी सानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे एका निवेदनातून केली आहे.


सानपाडा सेक्टर दोनमधील रहिवाशी रस्त्यावर खुलेआमपणे चालणाऱ्या कॉलेज युवक युवतींच्या अश्लिल चाळ्यामुळे त्रस्त झाले आहेत. परिसरातील वेस्टर्न कॉलेजमधील विद्यार्थी सेक्टर दोनमधील अंर्तगत भागात वेस्टर्न कॉलेज, ओपीजी टॉवर ते वात्सल्य ट्रस्ट या रस्त्यावर अश्लिल चाळे करताना पहावयास मिळतात. रस्त्याच्या कडेला, झाडांसभोवताली तसेच चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी उभ्या असलेल्या अवजड वाहनांच्या पाठीमागील बाजूस या विद्यार्थी विद्यार्थीनीचे अश्लिल चाळे सुरु असतात.



याबाबत रहीवाशांनी या विद्यार्थ्यांना हटकल्यावर रहीवाशांनाच शिवीगाळ करतात, दमदाटी करतात, अंगावर दावून जातात. या रस्त्यावरुन जाताना महिलांना, मुलींना, ज्येष्ठ नागरिकांना माना खाली घालून जावे लागते. या परिसरात पोलीसांची गस्त वाढवावी. जे जे विद्यार्थी अश्लिल चाळे करताना आढळतील त्यांना पोलीस ठाण्यात पकडून आणावे, त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून मुले काय उद्योग करतात, याची माहिती द्यावी. या परिसरात सुरु असणारे अश्लिल चाळे बंद करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त वाढवण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी सानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ