अश्लिल चाळे थांबविण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची भाजपाची मागणी

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर दोनमधील परिसरात कॉलेजवयीन युवक-युवतींकडून भर रस्त्यावर सुरु असलेले अश्लिल चाळे बंद करण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची लेखी मागणी भाजयुमाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी सानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे एका निवेदनातून केली आहे.


सानपाडा सेक्टर दोनमधील रहिवाशी रस्त्यावर खुलेआमपणे चालणाऱ्या कॉलेज युवक युवतींच्या अश्लिल चाळ्यामुळे त्रस्त झाले आहेत. परिसरातील वेस्टर्न कॉलेजमधील विद्यार्थी सेक्टर दोनमधील अंर्तगत भागात वेस्टर्न कॉलेज, ओपीजी टॉवर ते वात्सल्य ट्रस्ट या रस्त्यावर अश्लिल चाळे करताना पहावयास मिळतात. रस्त्याच्या कडेला, झाडांसभोवताली तसेच चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी उभ्या असलेल्या अवजड वाहनांच्या पाठीमागील बाजूस या विद्यार्थी विद्यार्थीनीचे अश्लिल चाळे सुरु असतात.



याबाबत रहीवाशांनी या विद्यार्थ्यांना हटकल्यावर रहीवाशांनाच शिवीगाळ करतात, दमदाटी करतात, अंगावर दावून जातात. या रस्त्यावरुन जाताना महिलांना, मुलींना, ज्येष्ठ नागरिकांना माना खाली घालून जावे लागते. या परिसरात पोलीसांची गस्त वाढवावी. जे जे विद्यार्थी अश्लिल चाळे करताना आढळतील त्यांना पोलीस ठाण्यात पकडून आणावे, त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून मुले काय उद्योग करतात, याची माहिती द्यावी. या परिसरात सुरु असणारे अश्लिल चाळे बंद करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त वाढवण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी सानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

Comments
Add Comment

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा