Chhattisgarh BSF Army : IED स्फोटात बीएसएफचे २ जवान गंभीर जखमी

रायपूर : छत्तीसगड मधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आज, शुक्रवारी नलक्षवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) २ जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गरपा गावाजवळ आज सकाळी बीएसएफ पथक गस्त घालत असताना ही घटना घडली.


गरपा कॅम्प आणि गरपा गावादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यात दोन बीएसएफ जवान जखमी झाल्याचे नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी गुरुवारी शेजारील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याने सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले होते.



तर १२ जानेवारी रोजी सुकमा जिल्ह्यातील एका घटनेत १० वर्षांची एक मुलगी जखमी झाली होते. तसेच विजापूर जिल्ह्यात अशाच प्रकारच्या आयईडी स्फोटात २ पोलिस जखमी झाले होते. दोन दिवसांपूर्वी नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा भागात झालेल्या अशाच २ वेगवेगळ्या घटनांत एका गावकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर तिघे जखमी झाले होते.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च