Chhattisgarh BSF Army : IED स्फोटात बीएसएफचे २ जवान गंभीर जखमी

रायपूर : छत्तीसगड मधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आज, शुक्रवारी नलक्षवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) २ जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गरपा गावाजवळ आज सकाळी बीएसएफ पथक गस्त घालत असताना ही घटना घडली.


गरपा कॅम्प आणि गरपा गावादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यात दोन बीएसएफ जवान जखमी झाल्याचे नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी गुरुवारी शेजारील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याने सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले होते.



तर १२ जानेवारी रोजी सुकमा जिल्ह्यातील एका घटनेत १० वर्षांची एक मुलगी जखमी झाली होते. तसेच विजापूर जिल्ह्यात अशाच प्रकारच्या आयईडी स्फोटात २ पोलिस जखमी झाले होते. दोन दिवसांपूर्वी नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा भागात झालेल्या अशाच २ वेगवेगळ्या घटनांत एका गावकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर तिघे जखमी झाले होते.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर