Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, अभिनेत्याला रुग्णालयात केलं दाखल

  201

मुंबई: बॉलिवूडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सैफच्या मुंबई स्थित घरात घुसून या अज्ञात व्यक्तीने रात्री २च्या सुमारास धारदार शस्त्राने हा हल्ला केला. सैफ अली खानच्या शरीरावर ६ वेळा वार करण्यात आले. दरम्यान, हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

काय म्हणाले मुंबई पोलीस?


सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सांगितले की बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या घरात घुसला. यावेळी तो नोकरानीसोबत वाद घालू लागलाय त्यानंतर सैफने तेथे मध्यस्थी करत त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र रागात असलेल्या त्या व्यक्तीने सैफ अली खानवरच हल्ला केला. दोघांमध्ये हाणमारी झाली. यावेळेस त्या व्यक्तीने सैफवर चाकूने ६ वेळा हल्ला केला.


 


ही हल्ल्याची घटना घडली त्यावेळेस कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र करिश्मा कपूरने ९ तासांपूर्वी एक पोस्ट शेअऱ केली होती. त्यात ती बहीण करिना कपूर, रिया आणि सोनम कपूरसह पार्टी करत होती. तिघांनी एकत्र डिनर एन्जॉय केला होता. करिनाने बहीण करिश्माची पोस्ट आपल्या अकाऊंटवरून रिशेअरही केली होती. दरम्यान, सैफवर हल्ला झाला त्यावेळस करिना गर्ल गँग सोबत होती की घरी होती याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.