Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, अभिनेत्याला रुग्णालयात केलं दाखल

  227

मुंबई: बॉलिवूडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सैफच्या मुंबई स्थित घरात घुसून या अज्ञात व्यक्तीने रात्री २च्या सुमारास धारदार शस्त्राने हा हल्ला केला. सैफ अली खानच्या शरीरावर ६ वेळा वार करण्यात आले. दरम्यान, हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

काय म्हणाले मुंबई पोलीस?


सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सांगितले की बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या घरात घुसला. यावेळी तो नोकरानीसोबत वाद घालू लागलाय त्यानंतर सैफने तेथे मध्यस्थी करत त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र रागात असलेल्या त्या व्यक्तीने सैफ अली खानवरच हल्ला केला. दोघांमध्ये हाणमारी झाली. यावेळेस त्या व्यक्तीने सैफवर चाकूने ६ वेळा हल्ला केला.


 


ही हल्ल्याची घटना घडली त्यावेळेस कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र करिश्मा कपूरने ९ तासांपूर्वी एक पोस्ट शेअऱ केली होती. त्यात ती बहीण करिना कपूर, रिया आणि सोनम कपूरसह पार्टी करत होती. तिघांनी एकत्र डिनर एन्जॉय केला होता. करिनाने बहीण करिश्माची पोस्ट आपल्या अकाऊंटवरून रिशेअरही केली होती. दरम्यान, सैफवर हल्ला झाला त्यावेळस करिना गर्ल गँग सोबत होती की घरी होती याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

Comments
Add Comment

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली