Panipat War : शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हरियाणात दाखल

हरियाणा : पानिपतच्या रणसंग्रामाच्या स्मृती जागवणारा मराठा शौर्य दिवस १४ जानेवारीला हरियाणातील बसताडा येथे होतो. पानिपत लढाईत वीरमरण आलेल्या योध्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी गेली २१ वर्ष हा उपक्रम केला जातो. आज हरियाणाच्या पानिपत येथे शौर्य दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हरियाणामध्ये गेले आहेत.






 

२ मोती गाळले, लाख बांगडी फुटली, २७ मोहोरा हरवल्या आणि चिल्लर खुर्द किती गेले याची गिणतीच झाली नाही, असं वर्णन ज्या युद्धाचं केलं जातं ते युद्ध म्हणजे पानिपतचं युद्ध. या पानिपतच्या लढाईला २६४ वर्ष पूर्ण होत आहे.





याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हरियाणाच्या पानिपत येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. याचे औचित्य साधून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपत येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहिले आहे. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील हजेरी लावली.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर