Mahakumbh : १४४ वर्षांनी मिळालेय भाग्य! कोण घेणार लाभ?

प्रयागराज : महाकुंभ (Mahakumbh) हा हिंदू धर्माचा महत्वाचा धार्मिक उत्सव आहे. भारतात महाकुंभचे आयोजन दर १२ वर्षांनी केले जाते. यात भाविक श्रद्धेने पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारतात. त्यामुळे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. महाकुंभाचे आयोजन प्रयागराजच्या संगमावर, हरिद्वार येथे गंगेत, उज्जैनमध्ये शिप्रा नदी आणि नाशिकच्या गोदावरी नदीवर केले जाते. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला प्रारंभ झाला असून हा उत्सव १३ जानेवारी २०२५ पौष पौर्णिमेपासून सुरू होऊन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी समाप्त होईल. यावर्षीचा कुंभमेळा खास आहे, कारण तो १४४ वर्षांनी येणाऱ्या एका शुभ योगात साजरा होतोय!


पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनातून अमृतकुंभ (Mahakumbh) म्हणजे अमृताने भरलेलं भांडं बाहेर आलं. हे अमृत देव आणि असुरांमध्ये वाटण्यासाठी देवतांनी कुंभ हाती घेतलं. त्यावेळी, भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृत वाचवलं आणि ते वाहून नेताना चार ठिकाणी काही थेंब जमिनीवर पडले. याच चार पवित्र ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहस्थितीनुसार आणि ज्योतिषशास्त्राच्या हिशोबानं या मेळ्याची वेळ ठरवली जाते. शतकानुशतके प्रयागराज इथं माघ मेळ्याचा उत्सव साजरा केला जातो. अनेक पुराणांमध्ये या वार्षिक मेळ्याचा उल्लेख आहे. कुंभमेळा हा फक्त धार्मिक उत्सव नसून, भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर होणारा हा मेळा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. कुंभमेळाच्या या ४४ दिवसांत, कोट्यवधी भाविक पवित्र स्नानासाठी प्रयागराज इथं येतील. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महाकुंभ २०२५’ होणारेय. या महाकुंभातील पहिलं शाही स्नान १४ जानेवारीला ‘मकरसंक्राती’च्या दिवशी होणारेय. यासाठी साडेदहा किलोमीटरचा घाट तयार केलाय. त्यानंतर २९ जानेवारी: मौनी अमावस्या, ३ फेब्रुवारी: वसंत पंचमी, १२ फेब्रुवारी: माघ पौर्णिमा आणि २६ फेब्रुवारी: महाशिवरात्र रोजी शाही स्नानाने सांगता होणारेय.



यंदाच्या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य तयारी केलीय. या कुंभमेळ्यासाठी १० हजार एकर जागेवर व्यवस्था केलीय. ६ हजार ८०० बसेस, २०० वातानुकूलित बसेस आणि लाखो भाविकांसाठी शौचालय, निवासस्थानं आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत भाविकांच्या सुरक्षेसाठी खास ५५ पोलीस स्थानके उभारण्यात आली असून ४५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात केलेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्नानाच्या दिवशी २ कोटीहून अधिक भाविक येतील. तर २९ जानेवारीला पौष अमावस्येला १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या उत्सवासाठी जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर उभारलेय. या शहरात ५० लाख ते १ कोटी भाविक सामावले जाऊ शकतात, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.


यावेळच्या महाकुंभाचा (Mahakumbh) विशेष योगायोग असा की, १४४ वर्षांनंतर अशी ग्रहस्थिती उद्भवलीय, ज्यामुळं हा कुंभमेळा अधिक शुभ मानला जातो. पवित्र स्नान तुम्हाला पापमुक्ती आणि आत्मिक उन्नतीचा अनुभव देतो. हा कुंभमेळा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून, तो जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. चला, आपणही या पवित्र सोहळ्याचा भाग होऊ या!

Comments
Add Comment

Vijay and Sangeetha Divorce : 'थलापती' विजय यांच्या संसाराचे वादळ शमले; पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

तामिळनाडू : अभिनेते तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता यांनी दाखल केलेला

Kiren Rijiju Statement on Amit Shah : 'ज्या दिवशी अमित शाह उत्तर देतील, ते तुम्हाला ऐकताही येणार नाही!' किरेन रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही

Redmi Note 17 5G Launched : Redmi Note 17 5G भारतात लाँच; ८०००mAh ची तगडी बॅटरी अन् ५०MP कॅमेरा, पाहा किमतीसह सर्व फीचर्स!

नवी दिल्ली : प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या लोकप्रिय रेडमी नोट सिरीजचा विस्तार करत भारतीय बाजारात

Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

कोची : मलेशियाची राजधानी कुआलालंपूरहून केरळच्या कोची शहराकडे येणाऱ्या विमानात बुधवारी रात्री एका प्रवाशाच्या

IRCTC Japan Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर : दिल्ली ते जपान १० दिवसांची मस्त सफर; टोकियो, ओसाका अन् हिरोशिमा फिरण्याची संधी!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'ने (IRCTC) परदेशात

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

हैलाकांडी : ईशान्य भारतातील आसाम (Assam) राज्यामधून एका अत्यंत भयानक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून