Mahakumbh : १४४ वर्षांनी मिळालेय भाग्य! कोण घेणार लाभ?

प्रयागराज : महाकुंभ (Mahakumbh) हा हिंदू धर्माचा महत्वाचा धार्मिक उत्सव आहे. भारतात महाकुंभचे आयोजन दर १२ वर्षांनी केले जाते. यात भाविक श्रद्धेने पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारतात. त्यामुळे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. महाकुंभाचे आयोजन प्रयागराजच्या संगमावर, हरिद्वार येथे गंगेत, उज्जैनमध्ये शिप्रा नदी आणि नाशिकच्या गोदावरी नदीवर केले जाते. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला प्रारंभ झाला असून हा उत्सव १३ जानेवारी २०२५ पौष पौर्णिमेपासून सुरू होऊन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी समाप्त होईल. यावर्षीचा कुंभमेळा खास आहे, कारण तो १४४ वर्षांनी येणाऱ्या एका शुभ योगात साजरा होतोय!


पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनातून अमृतकुंभ (Mahakumbh) म्हणजे अमृताने भरलेलं भांडं बाहेर आलं. हे अमृत देव आणि असुरांमध्ये वाटण्यासाठी देवतांनी कुंभ हाती घेतलं. त्यावेळी, भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृत वाचवलं आणि ते वाहून नेताना चार ठिकाणी काही थेंब जमिनीवर पडले. याच चार पवित्र ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहस्थितीनुसार आणि ज्योतिषशास्त्राच्या हिशोबानं या मेळ्याची वेळ ठरवली जाते. शतकानुशतके प्रयागराज इथं माघ मेळ्याचा उत्सव साजरा केला जातो. अनेक पुराणांमध्ये या वार्षिक मेळ्याचा उल्लेख आहे. कुंभमेळा हा फक्त धार्मिक उत्सव नसून, भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर होणारा हा मेळा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. कुंभमेळाच्या या ४४ दिवसांत, कोट्यवधी भाविक पवित्र स्नानासाठी प्रयागराज इथं येतील. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महाकुंभ २०२५’ होणारेय. या महाकुंभातील पहिलं शाही स्नान १४ जानेवारीला ‘मकरसंक्राती’च्या दिवशी होणारेय. यासाठी साडेदहा किलोमीटरचा घाट तयार केलाय. त्यानंतर २९ जानेवारी: मौनी अमावस्या, ३ फेब्रुवारी: वसंत पंचमी, १२ फेब्रुवारी: माघ पौर्णिमा आणि २६ फेब्रुवारी: महाशिवरात्र रोजी शाही स्नानाने सांगता होणारेय.



यंदाच्या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य तयारी केलीय. या कुंभमेळ्यासाठी १० हजार एकर जागेवर व्यवस्था केलीय. ६ हजार ८०० बसेस, २०० वातानुकूलित बसेस आणि लाखो भाविकांसाठी शौचालय, निवासस्थानं आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत भाविकांच्या सुरक्षेसाठी खास ५५ पोलीस स्थानके उभारण्यात आली असून ४५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात केलेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्नानाच्या दिवशी २ कोटीहून अधिक भाविक येतील. तर २९ जानेवारीला पौष अमावस्येला १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या उत्सवासाठी जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर उभारलेय. या शहरात ५० लाख ते १ कोटी भाविक सामावले जाऊ शकतात, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.


यावेळच्या महाकुंभाचा (Mahakumbh) विशेष योगायोग असा की, १४४ वर्षांनंतर अशी ग्रहस्थिती उद्भवलीय, ज्यामुळं हा कुंभमेळा अधिक शुभ मानला जातो. पवित्र स्नान तुम्हाला पापमुक्ती आणि आत्मिक उन्नतीचा अनुभव देतो. हा कुंभमेळा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून, तो जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. चला, आपणही या पवित्र सोहळ्याचा भाग होऊ या!

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत