भक्तीच्या महाकुंभचा आजपासून भव्य शुभारंभ, पहिले शाही स्नान आज

प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सोमवारी महाकुंभाला सुरूवात होत आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि आस्थेचे प्रतीक म्हणजे हा महाकुंभ दर १२ वर्षांनी आयोजित होतो. महाकुंभ भारताच्या पौराणिक पंरपरा आणि अध्यात्मक वारसेचा उत्सव आहे. दर १२ वर्षांनी प्रयागराजच्या संगमाच्या किनारी महाकुंभाचे आयोजन होते. येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीचे मिलन होते. महाकुंभाचे आयोजन १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत राहील.


याचे आयोजन ४ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आले आहे. कुंभमध्ये कोट्यावधी भक्तगण तसेच लाखोंच्या संख्येने साधु-संतही पोहोचतात. यासाठी खास तयारी केली जाते. यावेळेस महाकुंभामध्ये ४० कोटीहून अधिक भक्तगण येण्याची शक्यता आहे. केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक भक्तगण येथे संगमामध्ये शाही स्नानासाठी येतील. कुंभमेळ्यामध्ये बाबांचे विविधांगी रंग पाहायला मिळतात.



पौष पोर्णिमेच्या एक दिवस आधी ५० लाख लोकांनी केले स्नान


असे म्हणतात की कुंभच्या मेळ्यात स्नान केल्याने अखंड पापांपासून मुक्ती मिळते. समुद्रमंथनातू निघालेले अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात १२ वर्षे युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान त्या कलशातील अमृत ज्या ठिकाणी पडले तेथे कुंभ मेळा आयोजित केला होते. १२ वर्षे युद्ध चालल्याने कुंभ दर १२ वर्षांनी एकदा य्तो. महाकुंभमधील स्नान हे शाही स्नान म्हणून ओळखले जाते.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन