भक्तीच्या महाकुंभचा आजपासून भव्य शुभारंभ, पहिले शाही स्नान आज

प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सोमवारी महाकुंभाला सुरूवात होत आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि आस्थेचे प्रतीक म्हणजे हा महाकुंभ दर १२ वर्षांनी आयोजित होतो. महाकुंभ भारताच्या पौराणिक पंरपरा आणि अध्यात्मक वारसेचा उत्सव आहे. दर १२ वर्षांनी प्रयागराजच्या संगमाच्या किनारी महाकुंभाचे आयोजन होते. येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीचे मिलन होते. महाकुंभाचे आयोजन १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत राहील.


याचे आयोजन ४ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आले आहे. कुंभमध्ये कोट्यावधी भक्तगण तसेच लाखोंच्या संख्येने साधु-संतही पोहोचतात. यासाठी खास तयारी केली जाते. यावेळेस महाकुंभामध्ये ४० कोटीहून अधिक भक्तगण येण्याची शक्यता आहे. केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक भक्तगण येथे संगमामध्ये शाही स्नानासाठी येतील. कुंभमेळ्यामध्ये बाबांचे विविधांगी रंग पाहायला मिळतात.



पौष पोर्णिमेच्या एक दिवस आधी ५० लाख लोकांनी केले स्नान


असे म्हणतात की कुंभच्या मेळ्यात स्नान केल्याने अखंड पापांपासून मुक्ती मिळते. समुद्रमंथनातू निघालेले अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात १२ वर्षे युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान त्या कलशातील अमृत ज्या ठिकाणी पडले तेथे कुंभ मेळा आयोजित केला होते. १२ वर्षे युद्ध चालल्याने कुंभ दर १२ वर्षांनी एकदा य्तो. महाकुंभमधील स्नान हे शाही स्नान म्हणून ओळखले जाते.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी