भक्तीच्या महाकुंभचा आजपासून भव्य शुभारंभ, पहिले शाही स्नान आज

  75

प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सोमवारी महाकुंभाला सुरूवात होत आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि आस्थेचे प्रतीक म्हणजे हा महाकुंभ दर १२ वर्षांनी आयोजित होतो. महाकुंभ भारताच्या पौराणिक पंरपरा आणि अध्यात्मक वारसेचा उत्सव आहे. दर १२ वर्षांनी प्रयागराजच्या संगमाच्या किनारी महाकुंभाचे आयोजन होते. येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीचे मिलन होते. महाकुंभाचे आयोजन १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत राहील.


याचे आयोजन ४ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आले आहे. कुंभमध्ये कोट्यावधी भक्तगण तसेच लाखोंच्या संख्येने साधु-संतही पोहोचतात. यासाठी खास तयारी केली जाते. यावेळेस महाकुंभामध्ये ४० कोटीहून अधिक भक्तगण येण्याची शक्यता आहे. केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक भक्तगण येथे संगमामध्ये शाही स्नानासाठी येतील. कुंभमेळ्यामध्ये बाबांचे विविधांगी रंग पाहायला मिळतात.



पौष पोर्णिमेच्या एक दिवस आधी ५० लाख लोकांनी केले स्नान


असे म्हणतात की कुंभच्या मेळ्यात स्नान केल्याने अखंड पापांपासून मुक्ती मिळते. समुद्रमंथनातू निघालेले अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात १२ वर्षे युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान त्या कलशातील अमृत ज्या ठिकाणी पडले तेथे कुंभ मेळा आयोजित केला होते. १२ वर्षे युद्ध चालल्याने कुंभ दर १२ वर्षांनी एकदा य्तो. महाकुंभमधील स्नान हे शाही स्नान म्हणून ओळखले जाते.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.