Mahakumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात येणाऱ्या नागा साधुंचा काय आहे इतिहास ?

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ हा मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभमेळा हा १५ किलोमीटरच्या परिघात सुमारे ४५ दिवस चालणार आहे. या महाकुंभ मेळाव्यात नागा साधू येतात त्यांना धर्मरक्षक म्हटले जाते.



नागा म्हणजे काय?


जे भिक्षू कपड्यांशिवाय राहतात त्यांना नाग म्हणतात. तसेच त्यांना दिगंबर असेही म्हणतात. सनातन धर्मात नागा साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात. ते कधीही कपडे घालत नाहीत. तसेच इतिहास डोकावला तर असे लक्षात येते की याबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "नागा हा शब्द नागपासून आला आहे. नाग म्हणजे पर्वत. जे हलत नाहीत, ते एकाच ठिकाणी राहता त्याला नाग म्हणतात.



हा आहे इतिहास


प्राचीन काळात अनेक आक्रमणकर्त्यांना भारतावर हल्ले. त्यांचा पसरवण्यासाठी जनतेवर अत्याचार केले. त्या आक्रमकांना रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले. त्यांनी परकीयांविरोधात अनेक लढाया लढल्या आहेत. नागांनी त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केले. यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे महत्त्व आणि आदर आणखी वाढला. त्यांना शूर पुरुष, धर्मरक्षक आणि धर्मवीर म्हणून ओळखले जाते.



शास्त्राबरोबर शस्त्राची काय आहे परंपरा ?


नागा साधुंनी धर्म आणि समाजासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. नागा साधू हे जगतगुरू आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या आखाड्यांच्या काळापासून शस्त्रे वापरण्यात तरबेज आहेत. प्राचीन काळी नागा साधू त्रिशूळ, भाला, तलवार, कुऱ्हाड आणि खुकरी वापरत असत. आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. गेल्या २,५०० वर्षांपासून दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी ही परंपरा पाळत आहेत. ते आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करतात.

Comments
Add Comment

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने