Amravati : अमरावतीत विषबाधा! १००हून अधिक महिला रुग्णालयात

अमरावती : सध्या राज्यभरात विषबाधा होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच अमरावती जिल्ह्यातून धक्कायक बातमी समोर आली आहे. अमरावतीमध्ये एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या तब्बल १००हून अधिक महिलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. (Women Poisoned In Amravati)



मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अमरावतीच्या जवळ असणाऱ्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिला नेहमीप्रमाणे कामात हजर झाल्या. त्यानंतर त्यांनी कंपनीत उपलब्ध असणारे पाणी प्यायल्यानंतर काही महिलांना मळमळ जाणवू लागली. मात्र वातावरणातील फरकामुळे होत असावं या कारणामुळे अनेक महिलांनी याकडे दुर्लक्ष केले.
परंतु काहीवेळाने एकामागोमाग एक सर्व महिलांना असा त्रास जाणवू लागला. एकाच वेळी तब्बल १०० हून अधिक महिलांना हीच समस्या जाणवू लागल्याने कंपनीने गंभीर दखल घेत तातडीने सर्व पीडित महिलांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या सर्व महिलांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले.


दरम्यान, सध्या अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांवर उपचार सुरु आहेत. मात्र हा त्रास नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे स्पष्ट कारण अद्यापही समोर आलेले नाही. (Women Poisoned In Amravati)

Comments
Add Comment

Moshi incident : पुणे जिल्ह्यातील मोशी दुर्घटनेच्या ठिकाणी ७२ तासांनंतरही बचावकार्य सुरू

पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्याला वेग आला असून दुर्घटनाग्रस्त

Solapur News : सातारा जिल्ह्यातून परीक्षेसाठी सोलापुरात आलेली २२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Chandrashekhar Bawankule : परप्रांतीयांच्या कोकणातील जमीन खरेदीची चौकशी

- विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती; बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झालेल्या जमिनी सरकारजमा होणार मुंबई :

kharif pik vima : खरीप २०२६ पीक विम्यासाठी नवे नियम लागू; अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी या 5 गोष्टी जाणून घ्या

मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी पीक विमा योजनेत (Crop Insurance) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यंदा पीक विमा (Pik Vima)

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन