आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण झाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा (जे. पी. नड्डा) यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली पण रविंद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश टाळण्यात आला. हा निर्णय झाला त्याचवेळी रविंद्र चव्हाण भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. रविंद्र चव्हाणांना संयमी भूमिका राजकीयदृष्ट्या लाभदायी ठरल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. आता ते पक्षाच्या संघटानात्मक कामांचे नेतृत्व करतील. लवकरच राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करणे, निवडणूक जिंकण्यासाठी धोरण आखणे आणि ते अमलात आणणे अशी कामं रविंद्र चव्हाणांना आता प्राधान्याने करावी लागतील. तर बावनकुळे पुढील काही दिवसांत पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Municipal Commissioner's administration : महानगरपालिकेच्‍या अधिकारी - कर्मचा-यांना 'ए.आय.' बाबत प्रशिक्षण

महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : 'उपयोग ' हा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी डिजिटल

Additional Municipal Commissioner : एसआयआरच्या कार्यक्रमासाठी रुजू न झालेल्या बीएलओंविरोधात पोलिसांत दाखल करणार गुन्हा

महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले स्पष्ट निर्देश मुंबई: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार

Agriculture Minister Dattatray Bharne : कृषी मित्र भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा; फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

कृषी मित्र भरतीच्या नावाखालील फसवणुकीला बळी पडू नका; शेतकरी व युवकांना कृषी मंत्र्यांचे आवाहन मुंबई : मुंबई

Mobile Network in Metro 3 Aqua Line : अखेर तीन महिन्यांनी झाला ‘नो नेटवर्क’चा अंत! मेट्रो-3च्या ॲक्वा लाईनमध्ये मोबाईल सेवा सुरळीत सुरु

- दररोज होणार दीड लाख प्रवाशांना फायदा मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ भूमिगत प्रवासादरम्यान मोबाईल

Shrikant Shinde : ‘टिप नाही तर राईड नाही!’ ॲप-आधारित टॅक्सींच्या मनमानीविरोधात श्रीकांत शिंदे आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी

Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या 'लँड जिहाद'वर प्रहार

मानखुर्दमधील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड