आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण झाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा (जे. पी. नड्डा) यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली पण रविंद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश टाळण्यात आला. हा निर्णय झाला त्याचवेळी रविंद्र चव्हाण भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. रविंद्र चव्हाणांना संयमी भूमिका राजकीयदृष्ट्या लाभदायी ठरल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. आता ते पक्षाच्या संघटानात्मक कामांचे नेतृत्व करतील. लवकरच राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करणे, निवडणूक जिंकण्यासाठी धोरण आखणे आणि ते अमलात आणणे अशी कामं रविंद्र चव्हाणांना आता प्राधान्याने करावी लागतील. तर बावनकुळे पुढील काही दिवसांत पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

...तर गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द होणार?

नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली जाण्याची शक्यता मुंबई :  गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या