बीड : बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ...
सरपंचाच्या बाबतीत जो घडले त्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी, सीआयडी ते न्यायालयीन चौकशी अशा तीन पातळीवर चौकशी सुरू केली आहे. कोणालाही विशेष संरक्षण मिळणार नाही. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होईल. अगदी मंत्री असला तरी कारवाई होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.... हे सांगूनही अजित पवारांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले. प्रश्नांच्या या सरबत्तीमुळे अजित पवार संतापले.
तुझी चौकशी कधी होईल ?...तुझं नाव आलं तर होईल ना...जर तुझं नाव आलं नसेल तर बळ बळ तुझी चौकशी करतील का रे ?...काय तुम्ही पण... म्हणत अजित पवार संतापले आणि निघून गेले.