धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर संतापले अजित पवार

मुंबई : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात जणांवर मकोका लागवण्यात आला. आणखी एकाचा शोध सुरू आहे. आरोपी सापडताच त्याच्या विरोधातही मकोका अंर्गत कारवाई होणार आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी वसुली प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक झाली आहे. वाल्मिक कराड विरोधात कोणत्या कलमांतर्गत कारवाई होणार हे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही. पोलीस कारवाई सुरू असली तरी या प्रकरणात राजकीय विरोधक सतत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या संदर्भात विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार संतापले.



सरपंचाच्या बाबतीत जो घडले त्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी, सीआयडी ते न्यायालयीन चौकशी अशा तीन पातळीवर चौकशी सुरू केली आहे. कोणालाही विशेष संरक्षण मिळणार नाही. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होईल. अगदी मंत्री असला तरी कारवाई होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.... हे सांगूनही अजित पवारांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले. प्रश्नांच्या या सरबत्तीमुळे अजित पवार संतापले.

तुझी चौकशी कधी होईल ?...तुझं नाव आलं तर होईल ना...जर तुझं नाव आलं नसेल तर बळ बळ तुझी चौकशी करतील का रे ?...काय तुम्ही पण... म्हणत अजित पवार संतापले आणि निघून गेले.
Comments
Add Comment

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक, सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभाग

महापालिकेचे वादग्रस्त कचरा खासगीकरणाचे कंत्राटाची निविदा अंतिम, कंपन्यांनी सुमारे ३२ ते ३४ टक्के अधिक दराने लावली बोली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित

मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची शासनाकडे सव्वा तीन हजार कोटींची थकबाकी, महापालिकेच्या पाठपुराव्याला अपयश

मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल २ लाख ३२ हजार कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली. ही

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास