Uday Samant : ...या सगळ्याचे फटके बसल्यामुळे उबाठा गटाने स्वबळाचा निर्णय घेतला!

मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला


मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता पालिका निवडणुकांना (Municipal Election) सुरुवात होणार आहे. सर्व राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची तयारी सुरु असताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना या विधानावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी चांगलाच टोला लगावला आहे.



महाविकास आघाडीत नेमके काय सुरू आहे, हे त्यांच्या मतदारांना देखील कळत नाही. २०१९ला शिवसेनेला बहुमत मिळालेले असताना ते दुसऱ्याबरोबर म्हणजे काँग्रेसबरोबर गेले. त्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणे, म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भविष्यात हाताचा प्रचार शिवसेनेकडून कधीही होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांचा प्रचार करणे. भाषणात हिंदूह्रदयसम्राट शब्द न वापरणे, या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून उबाठा गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.


त्याचबरोबर, उबाठा गटातील नेत्यांना काही गोष्टींची जाणीव झाली असल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहेत. तसेच सत्तेत येण्यासाठी खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांकडे आता मुख्यमंत्र्यांजवळ जाण्याशिवाय पर्याय नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.


Comments
Add Comment

रचना संसद महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव; ‘आउट ऑफ द बॉक्स’ कला कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

घोणसरी येथे मादी बिबट्याला पकडून सोडले अधिवासात

कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सती मंदिर येथे बिबट असल्याचे नागरिकांनी कळवले.

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्र मार्गे अमेरिकेसाठी रवाना - पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन

बॉलीवूड क़्विन माधुरी दिक्षित साकारणार नवी भूमिका: जाणून घ्या कुठे आणि कधी पाहायला मिळणार ...

मुंबई : बॉलीवूडची ग्लॅमर्स अभिनेत्री माधुरी दीक्षित साकारणार हटके भूमिका. ott वर चर्चेत असणारी वेब सिरीज म्हणजेच Mrs

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत