Uday Samant : ...या सगळ्याचे फटके बसल्यामुळे उबाठा गटाने स्वबळाचा निर्णय घेतला!

मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला


मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता पालिका निवडणुकांना (Municipal Election) सुरुवात होणार आहे. सर्व राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची तयारी सुरु असताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना या विधानावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी चांगलाच टोला लगावला आहे.



महाविकास आघाडीत नेमके काय सुरू आहे, हे त्यांच्या मतदारांना देखील कळत नाही. २०१९ला शिवसेनेला बहुमत मिळालेले असताना ते दुसऱ्याबरोबर म्हणजे काँग्रेसबरोबर गेले. त्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणे, म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भविष्यात हाताचा प्रचार शिवसेनेकडून कधीही होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांचा प्रचार करणे. भाषणात हिंदूह्रदयसम्राट शब्द न वापरणे, या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून उबाठा गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.


त्याचबरोबर, उबाठा गटातील नेत्यांना काही गोष्टींची जाणीव झाली असल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहेत. तसेच सत्तेत येण्यासाठी खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांकडे आता मुख्यमंत्र्यांजवळ जाण्याशिवाय पर्याय नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.


Comments
Add Comment

उज्‍ज्‍वल करिअर घडवण्‍यासाठी आवश्‍यक असलेली ५ कौशल्‍ये: लिंक्‍डइन

लिंक्‍डइन स्किल्‍स ऑन द राइज २०२६ च्‍या मते, एआय अँड ऑटोमेशन, डेटा अँड अॅनालिटिक्‍स, आयटी अँड सायबरसिक्‍युरिटी,

लंडन फॅशन वीक २०२६ मध्ये क्रिती सॅनन हिने उधळला ग्लॅमर

लंडन : बॉलिवूडमधील आघाडीची स्टाइल आयकॉन Kriti Sanon हिने पुन्हा एकदा लंडन फॅशन वीकमध्ये आपल्या शानदार उपस्थितीने

अल्लू अर्जुन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘AA22xA6’मध्ये नवी जोडी ठरली चर्चेचा विषय

मुंबई : भारतीय सिनेमात पहिल्यांदाच असा काहीतरी मोठा धमाका घडणार आहे, जो खऱ्या अर्थाने भव्य ठरणार आहे. दीपिका

ऐन रिलीजच्या तोंडावर केरळ स्टोरी २ सिनेमात सेन्सॉर बोर्डाने सुनावले चक्क १६ बदल

मुंबई : लव्ह जिहाद या मुद्द्यावर आधारित असलेला केरळ स्टोरी या सिनेमाचा दुसरा भाग येत्या शुक्रवारी २७

मुंबईत दोन दिवसांची इसेक्टॉन २०२६ परिषद

मुंबई : भारतभरातील संजीवन शास्त्रज्ञ (परफ्यूजन शास्त्र) क्षेत्रातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र

कोका-कोला इंडियाकडून विशेष मोहिमेच्‍या माध्‍यमातून पुन्‍हा ‘रिमझिम जीरा’ लाँच

नवी दिल्‍ली : भारतीयांना पुन्‍हा एकदा स्‍थानिक स्‍वादाचा अनुभव मिळणार आहे, कारण कोका-कोला पुन्‍हा एकदा आपले