Uday Samant : ...या सगळ्याचे फटके बसल्यामुळे उबाठा गटाने स्वबळाचा निर्णय घेतला!

मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला


मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता पालिका निवडणुकांना (Municipal Election) सुरुवात होणार आहे. सर्व राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची तयारी सुरु असताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना या विधानावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी चांगलाच टोला लगावला आहे.



महाविकास आघाडीत नेमके काय सुरू आहे, हे त्यांच्या मतदारांना देखील कळत नाही. २०१९ला शिवसेनेला बहुमत मिळालेले असताना ते दुसऱ्याबरोबर म्हणजे काँग्रेसबरोबर गेले. त्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणे, म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भविष्यात हाताचा प्रचार शिवसेनेकडून कधीही होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांचा प्रचार करणे. भाषणात हिंदूह्रदयसम्राट शब्द न वापरणे, या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून उबाठा गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.


त्याचबरोबर, उबाठा गटातील नेत्यांना काही गोष्टींची जाणीव झाली असल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहेत. तसेच सत्तेत येण्यासाठी खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांकडे आता मुख्यमंत्र्यांजवळ जाण्याशिवाय पर्याय नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.


Comments
Add Comment

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

शाहरुख खानच्या ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी रेड चिलीज एंटरटेनमेंट, मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि यशराज फिल्म्स यांची ऐतिहासिक भागीदारी

मुंबई : रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी शाहरुख खान अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट

'मिर्झापूर: द फिल्म'च्या अखेरच्या शूटिंगनंतर अली फजल भावूक, शेअर केला खास संदेश

मुंबई: बहुप्रतीक्षित 'मिर्झापूर: द फिल्म'चे अखेरचे शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले असून, भारतातील सर्वात लोकप्रिय

सलमान खानचा 'तेरे नाम' २२ वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

Tere Nam Re-release Date : सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट परत येत आहे आणि सलमान खानचे चाहते या चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा

‘पेड्डी’चे निर्माते वेंकट सतीश किलारू आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी राम चरणचे जुळ्या बाळांच्या आनंदवार्तेवर केले अभिनंदन

राम चरणच्या आगामी पेड्डी या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच त्याच्या वैयक्तिक