Poli Bhaji Rate : वडापाव नंतर महागली पोळी भाजी!

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईकरांच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या आणि खिशाला परवडणाऱ्या वडापावचे भाव वाढले. कधीही परवडणारा हा वडापाव महाग झाल्याने मुंबईकरांमध्ये नाराजी दिसून आली. अशातच आता पोळी भाजीचे दरही वाढले आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.


सर्वत्र महागाई वाढल्याने त्याची झळ पोळी भाजीला बसली आहे. १०० ग्रॅम भाजीचा दर २५ रुपये होता त्यासाठी आता ग्राहकांना ३० रुपये द्यावे लागतील. तर वरण आमटी आणि कढीसाठी २० रुपये मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून डाळ, साखर, तेल,तुप, गॅस सर्वांचेच दर वाढले आहेत. भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. अनेक भाज्यांनी शंभरी गाठलीय.



मुंबई हे नोकरदारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र वडापाव पाठोपाठ पोळी भाजीचे दर वाढल्याने मुंबईकर हवालदिल झाले आहे.

Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका