Poli Bhaji Rate : वडापाव नंतर महागली पोळी भाजी!

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईकरांच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या आणि खिशाला परवडणाऱ्या वडापावचे भाव वाढले. कधीही परवडणारा हा वडापाव महाग झाल्याने मुंबईकरांमध्ये नाराजी दिसून आली. अशातच आता पोळी भाजीचे दरही वाढले आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.


सर्वत्र महागाई वाढल्याने त्याची झळ पोळी भाजीला बसली आहे. १०० ग्रॅम भाजीचा दर २५ रुपये होता त्यासाठी आता ग्राहकांना ३० रुपये द्यावे लागतील. तर वरण आमटी आणि कढीसाठी २० रुपये मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून डाळ, साखर, तेल,तुप, गॅस सर्वांचेच दर वाढले आहेत. भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. अनेक भाज्यांनी शंभरी गाठलीय.



मुंबई हे नोकरदारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र वडापाव पाठोपाठ पोळी भाजीचे दर वाढल्याने मुंबईकर हवालदिल झाले आहे.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये