भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने- पंतप्रधान

जगातील युद्धांवर पॉडकास्टमध्ये मांडली भूमिका


नवी दिल्ली : जगात सुरू असलेल्या युद्धांच्या संदर्भात भारताची भूमिका तटस्थ नाही. तर भारत शांततेच्या बाजुने असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एका पॉडकास्ट मुलाखतीत पंतप्रधानांनी हे मनोगत व्यक्त केले.


रशिया आणि युक्रेनममध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युध्द सुरू आहे. यात लाखो लोक मारल्या गेले आहेत. पश्चिम आशियातील इस्रायल-हमास-इराण संघर्षामुळेही अभूतपूर्व मानवीय संकट निर्माण झाले आहे. भारत या आव्हानाकडे कसे पाहतो..? देश जगाच्या मित्राच्या भूमिकेत आहे की तटस्थ आहे, या प्रश्नावर, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की भारत शांततेच्या बाजूने आहे.



जागतिक शक्तींमधील प्राणघातक, हिंसक संघर्षादरम्यान भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, आज जगात भारताबद्दल विश्वास आहे. आमचे वागणे दुटप्पी नसून आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे वागत नाही. या संकटकाळात आम्ही सातत्याने सांगितले आहे की, आम्ही तटस्थ नसून शांततेच्या बाजूने आहोत. माझा दृष्टिकोन शांतीचा आहे आणि त्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील त्यांना मी पाठिंबा देईन असे मोदींनी सांगितले. रशिया-युक्रेन, इस्रायल, इराण आणि पॅलेस्टाईनलाही माझे हेच सांगणे असते की, शांततेतून प्रश्न सुटतो त्यामुळे शांतील पर्याय नाही. विशेष म्हणजे भारतीयांना जसा माझ्यावर विश्वास आहे की, हे देशाचे संकट योग्य पद्धतीने हाताळतील तसाच विश्वास या देशांना देखील आहे की, भारत जे बोलतो तीच त्यांची खरी आणि योग्य भूमिका आहे असे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या