भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने- पंतप्रधान

जगातील युद्धांवर पॉडकास्टमध्ये मांडली भूमिका


नवी दिल्ली : जगात सुरू असलेल्या युद्धांच्या संदर्भात भारताची भूमिका तटस्थ नाही. तर भारत शांततेच्या बाजुने असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एका पॉडकास्ट मुलाखतीत पंतप्रधानांनी हे मनोगत व्यक्त केले.


रशिया आणि युक्रेनममध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युध्द सुरू आहे. यात लाखो लोक मारल्या गेले आहेत. पश्चिम आशियातील इस्रायल-हमास-इराण संघर्षामुळेही अभूतपूर्व मानवीय संकट निर्माण झाले आहे. भारत या आव्हानाकडे कसे पाहतो..? देश जगाच्या मित्राच्या भूमिकेत आहे की तटस्थ आहे, या प्रश्नावर, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की भारत शांततेच्या बाजूने आहे.



जागतिक शक्तींमधील प्राणघातक, हिंसक संघर्षादरम्यान भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, आज जगात भारताबद्दल विश्वास आहे. आमचे वागणे दुटप्पी नसून आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे वागत नाही. या संकटकाळात आम्ही सातत्याने सांगितले आहे की, आम्ही तटस्थ नसून शांततेच्या बाजूने आहोत. माझा दृष्टिकोन शांतीचा आहे आणि त्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील त्यांना मी पाठिंबा देईन असे मोदींनी सांगितले. रशिया-युक्रेन, इस्रायल, इराण आणि पॅलेस्टाईनलाही माझे हेच सांगणे असते की, शांततेतून प्रश्न सुटतो त्यामुळे शांतील पर्याय नाही. विशेष म्हणजे भारतीयांना जसा माझ्यावर विश्वास आहे की, हे देशाचे संकट योग्य पद्धतीने हाताळतील तसाच विश्वास या देशांना देखील आहे की, भारत जे बोलतो तीच त्यांची खरी आणि योग्य भूमिका आहे असे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा

Emergency Flight Landing : दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग; १५४ प्रवासी सुरक्षित

लखनौ येथे आज म्हणजेच शनिवार ११ एप्रिल सकाळी दुबईहून काठमांडूकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या फ्लाइटचे (एफजेड-1133)

Voters : एसआयआरमध्ये देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली

नवी दिल्ली : विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर देशातील 9 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ