भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने- पंतप्रधान

जगातील युद्धांवर पॉडकास्टमध्ये मांडली भूमिका


नवी दिल्ली : जगात सुरू असलेल्या युद्धांच्या संदर्भात भारताची भूमिका तटस्थ नाही. तर भारत शांततेच्या बाजुने असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एका पॉडकास्ट मुलाखतीत पंतप्रधानांनी हे मनोगत व्यक्त केले.


रशिया आणि युक्रेनममध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युध्द सुरू आहे. यात लाखो लोक मारल्या गेले आहेत. पश्चिम आशियातील इस्रायल-हमास-इराण संघर्षामुळेही अभूतपूर्व मानवीय संकट निर्माण झाले आहे. भारत या आव्हानाकडे कसे पाहतो..? देश जगाच्या मित्राच्या भूमिकेत आहे की तटस्थ आहे, या प्रश्नावर, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की भारत शांततेच्या बाजूने आहे.



जागतिक शक्तींमधील प्राणघातक, हिंसक संघर्षादरम्यान भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, आज जगात भारताबद्दल विश्वास आहे. आमचे वागणे दुटप्पी नसून आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे वागत नाही. या संकटकाळात आम्ही सातत्याने सांगितले आहे की, आम्ही तटस्थ नसून शांततेच्या बाजूने आहोत. माझा दृष्टिकोन शांतीचा आहे आणि त्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील त्यांना मी पाठिंबा देईन असे मोदींनी सांगितले. रशिया-युक्रेन, इस्रायल, इराण आणि पॅलेस्टाईनलाही माझे हेच सांगणे असते की, शांततेतून प्रश्न सुटतो त्यामुळे शांतील पर्याय नाही. विशेष म्हणजे भारतीयांना जसा माझ्यावर विश्वास आहे की, हे देशाचे संकट योग्य पद्धतीने हाताळतील तसाच विश्वास या देशांना देखील आहे की, भारत जे बोलतो तीच त्यांची खरी आणि योग्य भूमिका आहे असे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत