IND-W vs IRE-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास, पहिल्या वनडेत टीम इंडियाचा दमदार विजय

  81

मुंबई: भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना १० जानेवारीला खेळवण्यात आला. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने सहा विकेटनी विजय मिळवला. भारताला विजयासाठी २३९ धावांचे आव्हान मिळाले होते. हे त्यांनी ३४.३ षटकांत पूर्ण केले. आता दोन्ही संघादरम्यानचा मालिकेतील दुसरा सामना १२ जानेवारीला याच मैदानावर खेळवला जाईल.



प्रतिकाची जबरदस्त खेळी, स्मृतीने रचला इतिहास


भारताकडून सलामीवीर प्रतिका रावलने सर्वाधिक ९६ बॉलमध्ये ८९ धावांची खेळी केली. या दरम्यान प्रतिकाने १० चौकारांच्या शिवाय एक सिक्सर लावला. प्रतिका प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आली. तेजल हसबनीसनेही ४६ बॉलमध्ये ५३ धावांवर नाबाद राहिली. यात ९ चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार स्मृती मंधानाने २९ चेंडूंचा सामना करताना ४१ धावा केल्या. मंधानाने आपल्या डावात ६ चौकाराशिवाय एक सिक्सर ठोकला. आयर्लंडसाठी हॅरी मॅगुइरेने सर्वाधिक तीन जणांना बाद केले.


स्मृती मंधानाने ४१ धावांच्या खेळीदरम्यान महिला वनडेमध्ये आपले ४ हजार धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय फलंदाज आहे. याआधी मिताली राजने ही कामगिरी केली होती. तसेच वेगवान चार हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत ती मितालीच्या पुढे गेली आहे. एकूण मिळून स्मृती महिला वनडेमध्ये सर्वात वेगवान ४ हजार धावा बनवण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल