मुंबईत अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वरुण सरदेसाईंचा विरोध

मुंबई : अनधिकृत बांधकामावरील कारवाईला उद्धव ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विरोध केला आहे. वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. याच भागातील भारतनगर भागात अनधिकृत बांधकामांवर झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने कारवाई सुरू केली होती. पण वरुण सरदेसाई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याला विरोध केला.



अनधिकृत बांधकाम प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने १७८ जणांना नोटीसा बजावल्या होत्या. झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या नियोजीत प्रकल्पासाठी त्यांच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठीच या नोटिसा देण्यात आल्या होत्या. नोटिसा बजावून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई सुरू होती. पण आमदार वरुण सरदेसाई यांनी अनधिकृत बांधकाम हटविण्याला विरोध केला.



कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती आणल्याचा दावा वरुण सरदेसाई यांनी उपस्थित जमावासमोर बोलताना केला. ज्यांचे बांधकाम पाडणार आहात त्यांना पर्यायी जागा द्या, आधी पुनर्वसन करा नंतर कारवाई करा; अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केली.
Comments
Add Comment

BMC News : प्रत्येक विभागस्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे स्पष्ट निर्देश मुंबई : मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी संपूर्ण

Mumbai-Goa Express Way : कोकणकरांचा प्रवास आता होणार सुसाट; महामार्ग लवकरच तयार होण्याच्या मार्गावर

मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे आणि बहुतेक जणांच्या नजरा या कोकणाकडे वळल्या आहेत, त्यामुळे गावच्या वाटा

लक्ष द्या ! 1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये होणार 'हे' मोठे बदल , आताच जाणून घ्या

LPG Cylinder Booking Rule : घरांपासून ते मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सपर्यंत सर्वत्र एलपीजीचा वापर केला जातो. मध्य पूर्वेतील

Neelam Gorhe Shivsena : नीलम गोऱ्हेना शिवसेनेतच विरोध? तरीही शिंदेनी दिली उमेदवारी; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकीची धांदल आता सुरु झाली आहे. आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Watermelon Case : कलिंगड खाऊन मृत्यू की प्लॅन केलेला कट? पायधुनीतील 'त्या' ४ मृत्यूंमागे ७ वर्ष जुनं रहस्य!

मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरातील घाटी गल्लीत एका घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे. येथील 'मुघल

Watercut In Mumbai : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे आणि तुर्भेपर्यंतचा जलबोगदा होणार सुरु

येत्या ५ ते ६ मे रोजी ३० तासांची जोडणी कामांसाठी पाणीकपात मुंबई : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे