Gorewada Zoo : नागपूर प्राणीसंग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू!

नागपूर : नागपूरमधील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये (Gorewada Rescue Center) तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान तपासणी अहवालातून या प्राण्यांना बर्ड फल्यूची लागण झाली असून या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र वाघ आणि बिबट्याला नेमका बर्ड फ्लू (Bird Flu) कसा झाला? याबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे.



राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील वाघ आणि बिबट्याला चिकन खालल्यामुळे बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेले प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्यात येणार असून  प्राणीसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राण्यांना दिले जाणारे खाद्य तपासून द्यावे, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, चंद्रपूरमध्ये मानव आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या घटना वाढत असल्याने या प्राण्यांचे स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र, या रेस्क्यू सेंटरमध्ये आलेल्या प्राण्यांना पक्षी इन्फ्लुएंझाचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे