Gorewada Zoo : नागपूर प्राणीसंग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू!

  102

नागपूर : नागपूरमधील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये (Gorewada Rescue Center) तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान तपासणी अहवालातून या प्राण्यांना बर्ड फल्यूची लागण झाली असून या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र वाघ आणि बिबट्याला नेमका बर्ड फ्लू (Bird Flu) कसा झाला? याबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे.



राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील वाघ आणि बिबट्याला चिकन खालल्यामुळे बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेले प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्यात येणार असून  प्राणीसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राण्यांना दिले जाणारे खाद्य तपासून द्यावे, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, चंद्रपूरमध्ये मानव आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या घटना वाढत असल्याने या प्राण्यांचे स्थानांतरण करण्यात आले होते. मात्र, या रेस्क्यू सेंटरमध्ये आलेल्या प्राण्यांना पक्षी इन्फ्लुएंझाचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक