IND vs ENG : विराट, रोहितच्या निवृत्तीनंतर भारताची पहिल्यांदा इंग्लंडशी टक्कर

मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील १-३ अशा पराभवानंतर आता नव्या वर्षात टीम इंडिया नव्या मिशनसाठी तयारी करत आहे. भारतीय संघ आता घरातच इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही एकदम खास मालिका असणार आहे.


खरंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही फॉरमॅटमधील पहिली मालिका आहे. या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे.


रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्या खाद्यांवर इंग्लंड संघाला हरवण्याची जबाबदारी आहे. दरम्यान, कोहली आणि रोहितच्या निवृ्त्तीनंतर भारतीय संघाने अनेक टी-२०, वनडे सामने खेळलेत. मात्र इंग्लंडविरुद्धची ही पहिलीच मालिका असणार आहे.



गेल्या वेळेस टी-२० वर्ल्डकपमध्ये झाली होती टक्कर


गेल्या वेळेस भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सामना रंगला होता. तेव्हा सेमीफायनलमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळेस रोहित शर्माच्या हाती नेतृत्व होते. २७ जून २०२४मध्ये गुयानामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला ६८ धावांनी मात दिली होती. त्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. तेथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत खिताब जिंकला होता.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने