IND vs ENG : विराट, रोहितच्या निवृत्तीनंतर भारताची पहिल्यांदा इंग्लंडशी टक्कर

मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील १-३ अशा पराभवानंतर आता नव्या वर्षात टीम इंडिया नव्या मिशनसाठी तयारी करत आहे. भारतीय संघ आता घरातच इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही एकदम खास मालिका असणार आहे.


खरंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही फॉरमॅटमधील पहिली मालिका आहे. या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे.


रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्या खाद्यांवर इंग्लंड संघाला हरवण्याची जबाबदारी आहे. दरम्यान, कोहली आणि रोहितच्या निवृ्त्तीनंतर भारतीय संघाने अनेक टी-२०, वनडे सामने खेळलेत. मात्र इंग्लंडविरुद्धची ही पहिलीच मालिका असणार आहे.



गेल्या वेळेस टी-२० वर्ल्डकपमध्ये झाली होती टक्कर


गेल्या वेळेस भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सामना रंगला होता. तेव्हा सेमीफायनलमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळेस रोहित शर्माच्या हाती नेतृत्व होते. २७ जून २०२४मध्ये गुयानामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला ६८ धावांनी मात दिली होती. त्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. तेथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत खिताब जिंकला होता.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून