Chattisgarh: प्लांटची चिमणी पडल्याने मोठी दुर्घटना, २५हून अधिक जण अडकले

रायपूर: छत्तीसगडच्या मुंगेलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एका प्लांटची चिमणी पडल्याने तिच्याखाली अनेक मजूर दबले गेले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या चिमणीखाली कमीत कमी २५ मजूर अडकल्याचे सांगितले जात आहे. तसेच यात काही मजुरांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता आहे.


दुर्घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. तसेच मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही घटना सरगाव ठाणे क्षेत्रातील रामबोड भागात घडली.


 


दुर्घटना झाली त्या ठिकाणीी लोखंडाचे पाईप बनवल्या जाणाऱ्या फॅक्टरीच्या निर्मितीचे कार्य सुरू होते. कुसुम असे या कंपनीचे नाव आहे. याचा प्लांट तयार केला जात होता. त्या ठिकाणी चिमणीचे काम सुरू होते. यावेळेस ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सातत्याने परिस्थितीची निगराणी केली जात आहे. ज्या मजुरांना बाहेर काढले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे.



मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी व्यक्त केला शोक


मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनेची माहिती मिळतात तातडीने अधिकाऱ्यांना बचावकार्याबाबतचे आदेश दिले आहेत.
Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१