रायपूर: छत्तीसगडच्या मुंगेलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एका प्लांटची चिमणी पडल्याने तिच्याखाली अनेक मजूर दबले गेले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या चिमणीखाली कमीत कमी २५ मजूर अडकल्याचे सांगितले जात आहे. तसेच यात काही मजुरांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता आहे.
दुर्घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. तसेच मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही घटना सरगाव ठाणे क्षेत्रातील रामबोड भागात घडली.
दुर्घटना झाली त्या ठिकाणीी लोखंडाचे पाईप बनवल्या जाणाऱ्या फॅक्टरीच्या निर्मितीचे कार्य सुरू होते. कुसुम असे या कंपनीचे नाव आहे. याचा प्लांट तयार केला जात होता. त्या ठिकाणी चिमणीचे काम सुरू होते. यावेळेस ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सातत्याने परिस्थितीची निगराणी केली जात आहे. ज्या मजुरांना बाहेर काढले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे.
मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनेची माहिती मिळतात तातडीने अधिकाऱ्यांना बचावकार्याबाबतचे आदेश दिले आहेत.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…