Chattisgarh: प्लांटची चिमणी पडल्याने मोठी दुर्घटना, २५हून अधिक जण अडकले

रायपूर: छत्तीसगडच्या मुंगेलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एका प्लांटची चिमणी पडल्याने तिच्याखाली अनेक मजूर दबले गेले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या चिमणीखाली कमीत कमी २५ मजूर अडकल्याचे सांगितले जात आहे. तसेच यात काही मजुरांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता आहे.


दुर्घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. तसेच मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही घटना सरगाव ठाणे क्षेत्रातील रामबोड भागात घडली.


 


दुर्घटना झाली त्या ठिकाणीी लोखंडाचे पाईप बनवल्या जाणाऱ्या फॅक्टरीच्या निर्मितीचे कार्य सुरू होते. कुसुम असे या कंपनीचे नाव आहे. याचा प्लांट तयार केला जात होता. त्या ठिकाणी चिमणीचे काम सुरू होते. यावेळेस ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सातत्याने परिस्थितीची निगराणी केली जात आहे. ज्या मजुरांना बाहेर काढले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे.



मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी व्यक्त केला शोक


मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनेची माहिती मिळतात तातडीने अधिकाऱ्यांना बचावकार्याबाबतचे आदेश दिले आहेत.
Comments
Add Comment

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड