Torres : टोरेस कंपनीचा मालक देश सोडून पसार

मुंबई : टोरेस (Torres) या ज्वेलरी कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. या कंपनीने सोने, चांदी आणि मोइसॅनाइट स्टोनवर जबरदस्त रिटर्न देणार असल्याचे स्वप्न दाखवत हजारो लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. मात्र, कंपनीचे मालक रातोरात गायब झाले. त्यानंतर आता गुंतवणूकदार त्यांचे पैसे मिळवण्यासाठी कंपनीच्या बाहेर उभे असताना दिसून येत आहेत.


आता या कंपनीचे दोन मालक देश सोडून युक्रेनला पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर अन्य दोघांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. जॉन कार्टन आणि विक्टोरिया कोवालेको अशी युक्रेनला पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत.



या गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत शिवाजी पार्क पोलिसांनी १०० हून अधिक तक्रारदाराचे जबाब नोदविले आहे. तसेच तीन जणांना अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणात कोट्यवधीची उलाढाल झाली असून हा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. टोरेस या कंपनीने आठवड्याला मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सांगितले. त्यानुसार हजारो लोकांनी यात गुंतवणूक केली. त्यातून या कंपनीने कोट्यवधी रुपये गोळा केले. महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी गुंतवणूकदारांना परतावाही दिला, पण गेल्या दोन आठवड्यांत परिस्थिती बदलली आणि गुंतवणूकदारांना रिटर्न मिळणं बंद झालं. त्यानंतर सोमवारी अचानक कंपनीच्या सर्व शाखा बंद झाल्याचे दिसून आलं. दरम्यान, सोमवारी कंपनीच्या शाखांना टाळं लागल्याचं बघून गुंतवणूकदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण