Tejshree Pradhan : तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट!

मुंबई : मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आणि नावाजलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच आपल्या चाहत्यांना नवनवीन रुपात पहायला मिळते.तेजश्रीची प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिकाही चाहत्यांना फार भावली होती.चाहत्यांनी तिच्या मुक्ताच्या अभिनयाला भरभरून प्रेम दिले.

तेजश्रीच्या 'हॅशटॅग तदेव लग्नम्' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, अशातच तेजश्रीने प्रेमाची गोष्ट या मालिकेला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.




माहितीनुसार, तेजश्रीने 'स्टार प्रवाह' वरील प्रेमाची गोष्ट या मलिकेला रामराम करणार आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेतूनही तेजश्रीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. मालिकेतील मुक्ताला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.परंतु, अचानक तिच्या मालिका सोडण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. ही मालिका सोडल्यानंतर एक वेगळा चेहरा मुक्ताच्या अभिनयात पहायला मिळणार आहे. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री मुक्ताची भूमिका साकारणार आहे. हे असलं तरी, तेजश्री प्रधान हिने मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला? हे अद्याप अस्पष्ट आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची जागा आता अभिनेत्री स्वरदा ठिगळे घेणार आहे. माझे मन तुझे झाले, ताराराणी यासारख्या मालिकांमध्ये स्वरदाने आपली छाप पाडली आहे. आता स्वरदा मुक्ताच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ती मुक्ताच्या भुमिकेसाठी मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा