South Actor Ajith Kumar Accident : साऊथ अभिनेता अजित कुमारच्या कारचा भीषण अपघात

  125

मुंबई : साऊथमधील सुप्रसिद्ध अभिनेता अजित कुमारचा दुबईमध्ये भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कार रेसिंगचा सराव करत असताना हा अपघात झाला. अजित कुमार ताशी १८० किमी वेगाने कार चालवत होता. तरीही सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.



सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अजित कुमार पोर्श कार चालवताना दिसत आहे. 24H दुबई २०२५ कार रेसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो दुबईत गेला आहे. अजित कुमार ५३ वर्षीचा असून या शर्यतीसाठी ६ तास रेसिंग सराव करत होता.सराव संपणार असतानाच त्याची गाडी बॅरियरला धडकली आणि सात वेळा गोलगोल फिरली.



अजितचे पोर्श कारवरचे अचानक नियंत्रण सुटले आणि ती गाडी रुटवरच सात-आठ वेळा फिरल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर ती बॅरियरला धडकली. असे असले तरी अजित कुमारला तात्काळ गाडीतून बाहेर काढण्यात आले. अभिनेत्याच्या या अपघातानंतर त्याच्या चाहता वर्गाला मात्र धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.