Mamata Banerjee : ममता बॅनर्जींनी शेतक-यांसाठी जाहीर केले ३५० कोटी

'बंगला शस्य बीमा' योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार लाभ


कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी "बंगला शस्य बीमा" योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी ३५० कोटी निधी जारी करण्याची घोषणा केली.


ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला अत्यंत आनंद होत आहे की ‘बंगला शस्य बीमा’ योजनेअंतर्गत आम्ही आता ९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट ३५० कोटी जमा करत आहोत.


त्यांनी स्पष्ट केले की, ही मदत खरीप हंगामात प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली जात आहे.



आमच्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत, कारण राज्य सरकार सर्व पिकांसाठी, ज्यामध्ये बटाटे आणि ऊस यांचा समावेश आहे, संपूर्ण विमा प्रीमियम भरते, असेही त्यांनी सांगितले.


२०१९ मध्ये या योजनेची सुरुवात झाल्यापासून, राज्य सरकारने केवळ 'बंगला शस्य बीमा' योजनेअंतर्गत एकूण ३,५६२ कोटींची मदत १.१२ कोटी शेतकऱ्यांना दिली आहे. आम्ही नेहमीच बंगालमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत आणि भविष्यातही त्यांच्यासोबत राहू, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र