Mamata Banerjee : ममता बॅनर्जींनी शेतक-यांसाठी जाहीर केले ३५० कोटी

'बंगला शस्य बीमा' योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार लाभ


कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी "बंगला शस्य बीमा" योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी ३५० कोटी निधी जारी करण्याची घोषणा केली.


ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला अत्यंत आनंद होत आहे की ‘बंगला शस्य बीमा’ योजनेअंतर्गत आम्ही आता ९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट ३५० कोटी जमा करत आहोत.


त्यांनी स्पष्ट केले की, ही मदत खरीप हंगामात प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली जात आहे.



आमच्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत, कारण राज्य सरकार सर्व पिकांसाठी, ज्यामध्ये बटाटे आणि ऊस यांचा समावेश आहे, संपूर्ण विमा प्रीमियम भरते, असेही त्यांनी सांगितले.


२०१९ मध्ये या योजनेची सुरुवात झाल्यापासून, राज्य सरकारने केवळ 'बंगला शस्य बीमा' योजनेअंतर्गत एकूण ३,५६२ कोटींची मदत १.१२ कोटी शेतकऱ्यांना दिली आहे. आम्ही नेहमीच बंगालमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत आणि भविष्यातही त्यांच्यासोबत राहू, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या