Mamata Banerjee : ममता बॅनर्जींनी शेतक-यांसाठी जाहीर केले ३५० कोटी

  53

'बंगला शस्य बीमा' योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार लाभ


कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी "बंगला शस्य बीमा" योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी ३५० कोटी निधी जारी करण्याची घोषणा केली.


ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला अत्यंत आनंद होत आहे की ‘बंगला शस्य बीमा’ योजनेअंतर्गत आम्ही आता ९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट ३५० कोटी जमा करत आहोत.


त्यांनी स्पष्ट केले की, ही मदत खरीप हंगामात प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली जात आहे.



आमच्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत, कारण राज्य सरकार सर्व पिकांसाठी, ज्यामध्ये बटाटे आणि ऊस यांचा समावेश आहे, संपूर्ण विमा प्रीमियम भरते, असेही त्यांनी सांगितले.


२०१९ मध्ये या योजनेची सुरुवात झाल्यापासून, राज्य सरकारने केवळ 'बंगला शस्य बीमा' योजनेअंतर्गत एकूण ३,५६२ कोटींची मदत १.१२ कोटी शेतकऱ्यांना दिली आहे. आम्ही नेहमीच बंगालमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत आणि भविष्यातही त्यांच्यासोबत राहू, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके