Mamata Banerjee : ममता बॅनर्जींनी शेतक-यांसाठी जाहीर केले ३५० कोटी

  58

'बंगला शस्य बीमा' योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार लाभ


कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी "बंगला शस्य बीमा" योजनेअंतर्गत ९ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी ३५० कोटी निधी जारी करण्याची घोषणा केली.


ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला अत्यंत आनंद होत आहे की ‘बंगला शस्य बीमा’ योजनेअंतर्गत आम्ही आता ९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट ३५० कोटी जमा करत आहोत.


त्यांनी स्पष्ट केले की, ही मदत खरीप हंगामात प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली जात आहे.



आमच्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत, कारण राज्य सरकार सर्व पिकांसाठी, ज्यामध्ये बटाटे आणि ऊस यांचा समावेश आहे, संपूर्ण विमा प्रीमियम भरते, असेही त्यांनी सांगितले.


२०१९ मध्ये या योजनेची सुरुवात झाल्यापासून, राज्य सरकारने केवळ 'बंगला शस्य बीमा' योजनेअंतर्गत एकूण ३,५६२ कोटींची मदत १.१२ कोटी शेतकऱ्यांना दिली आहे. आम्ही नेहमीच बंगालमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत आणि भविष्यातही त्यांच्यासोबत राहू, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या