Crime News : चोरीचा अजब प्रकार! काहीच न सापडल्यानं महिलेची पप्पी घेऊन चोर पळाला

मुंबई : मालाड (Mumbai ) येथील कुरार भागात एक विचित्र आणि संतापजनक घटना (Crime News) घडली आहे. चोरीसाठी घरात घुसलेल्या चोरट्याला काहीही मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत, म्हणून त्याने घरात असलेल्या महिलेचं चुंबन घेतलं आणि तिथून पळ काढला. या प्रकरणात महिलेने तातडीने मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही पाहून चोराला अटक केली आहे.


कुरार परिसरातील एक ३८ वर्षीय महिला घरी एकटीच होती. चोरीच्या उद्देशाने चोर घरात शिरला आणि घरातील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही हाती न लागल्याने, चोरट्याने महिलेची पप्पी घेतली आणि पळून गेला. ही घटना ३ जानेवारी रोजी घडली.


महिलेच्या तक्रारीनुसार, चोरट्याने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि महिलेला धाक दाखवून मौल्यवान वस्तू, मोबाइल, रोख रक्कम, किंवा एटीएम कार्ड देण्याची मागणी केली. परंतु घरात अशा वस्तू नसल्याचं महिलेने सांगितल्यानंतर चोराने हे अजब कृत्य केलं.



महिलेच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी तपास सुरू केला आणि चोराला अटक केली. संबंधित चोर मालाड भागातच आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दरम्यान, त्याचा कोणताही पूर्वगुन्हेगारी रेकॉर्ड नाही. परंतु त्याच्याविरोधात महिलेच्या विनयभंगाचा आणि दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने दाखवलेली तत्परता आणि तक्रारीमुळे आरोपीला वेळीच अटक करण्यात यश आलं.


या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकाराने स्थानिकांमध्ये चोरट्यांच्या विकृत मानसिकतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता