Crime News : चोरीचा अजब प्रकार! काहीच न सापडल्यानं महिलेची पप्पी घेऊन चोर पळाला

मुंबई : मालाड (Mumbai ) येथील कुरार भागात एक विचित्र आणि संतापजनक घटना (Crime News) घडली आहे. चोरीसाठी घरात घुसलेल्या चोरट्याला काहीही मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत, म्हणून त्याने घरात असलेल्या महिलेचं चुंबन घेतलं आणि तिथून पळ काढला. या प्रकरणात महिलेने तातडीने मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही पाहून चोराला अटक केली आहे.


कुरार परिसरातील एक ३८ वर्षीय महिला घरी एकटीच होती. चोरीच्या उद्देशाने चोर घरात शिरला आणि घरातील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही हाती न लागल्याने, चोरट्याने महिलेची पप्पी घेतली आणि पळून गेला. ही घटना ३ जानेवारी रोजी घडली.


महिलेच्या तक्रारीनुसार, चोरट्याने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि महिलेला धाक दाखवून मौल्यवान वस्तू, मोबाइल, रोख रक्कम, किंवा एटीएम कार्ड देण्याची मागणी केली. परंतु घरात अशा वस्तू नसल्याचं महिलेने सांगितल्यानंतर चोराने हे अजब कृत्य केलं.



महिलेच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी तपास सुरू केला आणि चोराला अटक केली. संबंधित चोर मालाड भागातच आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दरम्यान, त्याचा कोणताही पूर्वगुन्हेगारी रेकॉर्ड नाही. परंतु त्याच्याविरोधात महिलेच्या विनयभंगाचा आणि दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने दाखवलेली तत्परता आणि तक्रारीमुळे आरोपीला वेळीच अटक करण्यात यश आलं.


या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकाराने स्थानिकांमध्ये चोरट्यांच्या विकृत मानसिकतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील