आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला; युतीच्या चर्चेला पुन्हा सुरूवात

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून, सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करेल, अशा चर्चा रंगल्या आहेत.


यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील १६ महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याबाबत समन्वय समिती स्थापन करून नियोजन करण्याबाबत चर्चा आहे. अशातच भाजपाचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे (Ashish Shelar meets Raj Thackeray) भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.



'आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सदिच्छा भेट होती. आशिष शेलार आता मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागांतर्गत काही चर्चा झालेली असू शकते. आताच विधानसभा निवडणुका झाल्यात. आपलं नवीन सरकार बसलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची केवळ सदिच्छा भेट होती, इतकाच अर्थ आहे. यात दुसरा कोणताही अर्थ नाही,' असे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर